शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

दुष्काळस्थितीवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 5:00 AM

 जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली, तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारांवर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यंत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, जिल्हाभरातील सर्वच १,९६० गावांची पैसेवारी ४६

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरुवातीला पावसात खंड व नंतर सरासरी पार झालेल्या पावसाने खरिपाची पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली. त्यामुळे अंतिम पैसेवारी काय जाहीर होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, यामध्ये गुरुवारी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच म्हणजे १,९६० गावांची ४६ पैसेवारी जाहीर केल्याने दुष्काळस्थितीवर शासनाची एकप्रकारे मोहर लागली आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली, तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारांवर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यंत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनखर्चही पडला नाही.   सरासरीपेक्षा जास्त पावसाने जमिनीत आर्द्रता व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. गुलाबी बोंडअळीसोबत यंदा ८० टक्के कपाशीवर यंदा बोंडसडचे संकट उद्भवले त्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांनी कमी आलेली आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी कपाशी काढून रबीसाठी हरभऱ्याची पेरणी केल्याचे दिसून आले. सततच्या पावसामुळे काही भागात तुरीवर ‘मर’रोगाचा प्रादुर्भाव झाला व आता शीतलहरमध्ये दवाळगेल्याने तूर जागेवरच सुकत असल्याने नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व आठ प्रकारच्या सवलती मिळण्याच मार्ग मोकळा झालेला आहे.

बोंडसडमुळे २.१७ लाख हेक्टरमधील कपाशी बाधितयंदा पावसामुळे कपाशीवर बोंडसड, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये २,४४,००२ हेक्टर क्षेत्रापैकी २,१७,००१ हेक्टरमधील कपाशीचे ३३ टक्क्यावर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५,९९९ हेक्टर, भातकुली १४,०५०, चांदूर रेल्वे ६,२८०, धामणगाव रेल्वे १६,८१०, नांदगाव खंडेश्वर ६,५००, अचलपूर १४,५००, अंजनगाव सुर्जी १७,५३८, दर्यापूर ३६,६०१, धारणी ९०, चिखलदरा १८५९, मोर्शी २९,८२६, वरुड २९,८९१, तिवसा १०,००० व चांदूरबाजार तालुक्यात १६,९५७ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी