शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शाळेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:12 IST

प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने .....

ठळक मुद्देसहनशक्ती संपली : चांदूर रेल्वे बस आगाराचा कारभार नियोजनशून्य

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने याच बसमधून प्रवास करू द्यावा, नसल्यास दुसºया बसची व्यवस्था करावी. मात्र, तोपर्यंत आम्ही ही बस पुढे जाऊ देणार नाही, असे या बालप्रवाशांनी ठणकावून सांगितले. मुलांच्या या पवित्र्यामुळे चांदूरहून दुसरी बस सोडावी लागली. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या कुºह्याच्या ठाणेदारांना बालकांनी या रोजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.तिवस्याहून चांदूर रेल्वेकरिता कुºहामार्गे पहिली बस पंक्चर झाल्याने त्यानंतरच्या तिवसा-चांदूर रेल्वे बसवर बरीच गर्दी होती. सकाळी १०.३० वाजता कुºहा येथून सुमारे ७० प्रवासी चढले. वाढोणा थांब्यावर आमला, चांदूर रेल्वे येथे शिक्षणासाठी जाणारे २५ ते ३० विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत होते. जागा नसल्याचे पाहून चालक-वाहकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्वरेने बसपुढे येत ती अडवून धरली व रस्त्यावर झोपले. जोपर्यंत आम्हाला घेत नाही किंवा दुसरी बस येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. बसमधील प्रवाशांनीही त्यांचे समर्थन केले. ही बाब चालक-वाहकांनी चांदूर आगाराला कळविली. त्यांनी कुऱ्हा पोलिसांना माहिती दिल्यामुळे पोलीस पथक उपनिरीक्षक प्रणीत पाटील यांच्या नेतृत्वात पोहोचले. पंचायत समिती सदस्य मंगेश भगोलेदेखील यावेळी पोहोचले. त्यांच्यासह विद्यार्थ्यांची रास्त मागणी प्रवाशांनी उचलून धरल्यामुळे चांदूर आगाराहून दुसरी पाठवून हा गुंता सोडविण्यात आला.कुºहा पोलिसांनी वाढोणा बस थांबा गाठला आणि विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. दुसरी बसच्या प्रतीक्षेत मुलांना शाळेत उशीर झाला असता. त्यातच काही मुलांचे पेपर होते. यामुळे पीएसआय प्रणीत पाटील यांनी पोलीस जीपने मुलांना आमला येथे पोहचविले आणि त्यांची गैरसोय टाळली. याबद्दल विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले.कुºह्याहून बसमध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांची दाटी झाली, की पुढच्या स्टॉपवर बस थांबवली जात नाही. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांची गर्र्दी पुढच्या बसची वाट पाहत राहते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून, चांदूर आगाराने शाळेच्या वेळेला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडावी.- अर्चना तिरमारे, शिक्षिकानेहमीच मुले बसच्या प्रतीक्षेत आढळून येतात. या मार्गावर धावणाºया चांदूर आगाराच्या बस एक तर वाईट अवस्थेला पोहोचल्या आहेत. दुसरीकडे बसफेºयांसाठी वेळेचे नियोजन पाळले जात नाही. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठांकडे आगार व्यवस्थापकाची तक्रार करणार आहे.- मंगेश भगोले, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :Schoolशाळा