शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी रोखली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:12 IST

प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने .....

ठळक मुद्देसहनशक्ती संपली : चांदूर रेल्वे बस आगाराचा कारभार नियोजनशून्य

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : प्रवाशांची दाटी असल्याने वाढोणा येथे थांबा न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसपुढे विद्यार्थ्यांनी लोटांगण घालून ती थांबवली. आम्हाला शाळेत जायला उशीर होत असल्याने याच बसमधून प्रवास करू द्यावा, नसल्यास दुसºया बसची व्यवस्था करावी. मात्र, तोपर्यंत आम्ही ही बस पुढे जाऊ देणार नाही, असे या बालप्रवाशांनी ठणकावून सांगितले. मुलांच्या या पवित्र्यामुळे चांदूरहून दुसरी बस सोडावी लागली. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या कुºह्याच्या ठाणेदारांना बालकांनी या रोजच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.तिवस्याहून चांदूर रेल्वेकरिता कुºहामार्गे पहिली बस पंक्चर झाल्याने त्यानंतरच्या तिवसा-चांदूर रेल्वे बसवर बरीच गर्दी होती. सकाळी १०.३० वाजता कुºहा येथून सुमारे ७० प्रवासी चढले. वाढोणा थांब्यावर आमला, चांदूर रेल्वे येथे शिक्षणासाठी जाणारे २५ ते ३० विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत होते. जागा नसल्याचे पाहून चालक-वाहकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्वरेने बसपुढे येत ती अडवून धरली व रस्त्यावर झोपले. जोपर्यंत आम्हाला घेत नाही किंवा दुसरी बस येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. बसमधील प्रवाशांनीही त्यांचे समर्थन केले. ही बाब चालक-वाहकांनी चांदूर आगाराला कळविली. त्यांनी कुऱ्हा पोलिसांना माहिती दिल्यामुळे पोलीस पथक उपनिरीक्षक प्रणीत पाटील यांच्या नेतृत्वात पोहोचले. पंचायत समिती सदस्य मंगेश भगोलेदेखील यावेळी पोहोचले. त्यांच्यासह विद्यार्थ्यांची रास्त मागणी प्रवाशांनी उचलून धरल्यामुळे चांदूर आगाराहून दुसरी पाठवून हा गुंता सोडविण्यात आला.कुºहा पोलिसांनी वाढोणा बस थांबा गाठला आणि विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. दुसरी बसच्या प्रतीक्षेत मुलांना शाळेत उशीर झाला असता. त्यातच काही मुलांचे पेपर होते. यामुळे पीएसआय प्रणीत पाटील यांनी पोलीस जीपने मुलांना आमला येथे पोहचविले आणि त्यांची गैरसोय टाळली. याबद्दल विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार मानले.कुºह्याहून बसमध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांची दाटी झाली, की पुढच्या स्टॉपवर बस थांबवली जात नाही. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांची गर्र्दी पुढच्या बसची वाट पाहत राहते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून, चांदूर आगाराने शाळेच्या वेळेला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडावी.- अर्चना तिरमारे, शिक्षिकानेहमीच मुले बसच्या प्रतीक्षेत आढळून येतात. या मार्गावर धावणाºया चांदूर आगाराच्या बस एक तर वाईट अवस्थेला पोहोचल्या आहेत. दुसरीकडे बसफेºयांसाठी वेळेचे नियोजन पाळले जात नाही. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठांकडे आगार व्यवस्थापकाची तक्रार करणार आहे.- मंगेश भगोले, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :Schoolशाळा