शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
3
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
4
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
5
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
6
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
7
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
8
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
9
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
10
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
11
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
12
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
13
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
14
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
15
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
17
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
18
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
19
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
20
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमाती 'आयोग' पोहोचणार शेवटच्या माणसांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:30 IST

Amravati : २० जिल्ह्यांत ३२ जणांची चमू सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने ३ जून रोजी मंजुरी दिल्यानंतर हा 'आयोग' शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्यभर प्रचार, प्रचार होणार आहे. या अनुषंगाने आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी पुढाकार घेतला असून, तसे पत्र भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.

'लोकमत'ने गेल्या पाच वर्षापासून हा आयोग स्थापन करण्यासंदर्भात सातत्याने वृत्तमालिका चालविली, हे विशेष. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात, तत्कालीन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ही मागणी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर, अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेत ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या ५१व्या बैठकीत तसा ठरावही मंजूर झाला होता. 'ट्रायबल फोरम' ने पाच वर्षापासून मागणी रेटून धरली होती.

या २० जिल्ह्यांमध्ये होतील पत्रपरिषदामुंबई, पालघर, नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव, ठाणे, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड, हिंगोली, अकोला, अहिल्यानगर, रायगड, जालना या २० जिल्ह्यांमध्ये पत्रपरिषदांमधून भूमिका मांडली जाणार आहे.

'आयोगा'चे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच

  • आदिवासी विकासमंत्री प्राचार्य अशोक उईके यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अनुसूचित जमाती आयोग हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी २० जिल्ह्यांत ३२ जणांवर जबाबदारी सोपविली आहे.
  • मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी हे जिल्हानिहाय पत्रपरिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजासाठी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाची माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजाला दिलेला शब्द पाळला, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. आयोगामुळे आदिवासींच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास योजना आणि कार्यक्रम अंमलबजावणी वेगाने होईल. बिगर आदिवासींनी बळकावलेल्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागांची विशेष पदभरती, अखर्चिक निधी, रखडलेले वनहक्क अशा विविध समस्या सुटतील."- डॉ. संदीप धुर्वे, माजी आमदार केळापूर-आर्णी.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावती