शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आम्हाला मध्य प्रदेशात जायचेय, धारणीवासीयांची मागणी; राष्ट्रपतींना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:15 IST

पाच गावांतील सरपंचांनी सीमेवर केले आंदोलन

धारणी (अमरावती) : तालुक्यातील बहुतांश गावे मध्य प्रदेशातील जिल्हा ठिकाणांवरून अवघी ८० किमी अंतरावर आहेत, तर अमरावती मुख्यालयाला जाण्यासाठी किमान दीडशे किमी प्रवास करावा लागतो. त्यातही रस्ते व इतर सुविधा नाहीत. त्यामुळे धारणी तालुक्यातील गावे मध्य प्रदेशात समाविष्ट करावीत, अशी मागणी मेळघाटवासीयांनी राष्ट्रपतींकडे केली. याबाबत शुक्रवारी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भोकरबर्डी गावाच्या वन तपासणी नाक्यावर पाच गावांमधील नागरिकांनी आंदोलन केले.

कुपोषणाच्या नावावर मेळघाटावर कोट्यवधींचा निधी कुपोषण दूर होऊन आदिवासींचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने मेळघाटात विकास योजना गत ३० वर्षांपासून राबविण्यात येत आहे. मात्र, करोडा रुपये खर्च करून सुद्धा मेळघाटातील कुपोषणाची स्थिती कायम आहे. विकासाच्या नावावर आलेला निधी गेला कुठे? हा प्रश्न उपस्थित करीत मेळघाटातील तापी नदी काठालगतच्या गावकऱ्यांनी मध्य प्रदेशची सीमा जवळ असल्यामुळे आमच्या गावांचा समावेश मध्य प्रदेशात करावा, अशी मागणी रेटून धरली आहे.

गावकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्यासह दोन्ही राज्यांतील मुख्य सचिवांना व राज्यपालांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे. याबाबत मेळघाटाचे आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. १९९४ पासून मेळघाटात कुपोषणाचा उद्रेक झाला. कुपोषणामुळे हजारो बालके दरवर्षी मृत्युमुखी पडतात. हे मृत्यूदर कमी व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने विविध योजना आखून मेळघाटात अपर जिल्हाधिकारी पदाचे कार्यालय स्थापित करून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमला आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून मेळघाटात विकास कामांवर दरवर्षी कोट्यवधींची निधी दिला. त्यानंतरही मेळघाटातील विकासाचे चित्र दयनीय आहे. त्यामुळे सकाळी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील भोकरबर्डी गावाच्या वन तपासणी नाक्यावर परिसरातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल यांच्या नेतृत्वाखाली मेळघाटातील धारणी तालुका मध्य प्रदेशात समाविष्ट करा, अशी घोषणा देत आंदोलन केले.

'या' गावांतील नागरिकांचा सहभाग

या आंदोलनात भोकरवर्डी, धूळघाट गडगा, खापरखेडा, बेरदा बलडा आणि चिचघाट या पाच गावांतील सरपंच व नागरिकांनी सहभाग घेतला होता. या मागणीमुळे भविष्यात महाराष्ट्र आणि मेळघाटातील सीमावाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

मेळघाटातील चित्र विदारक

मेळघाटातील २४ गावांना अद्यापपर्यंत वीजपुरवठा करण्यास शासन अपयशी ठरले आहे. ७० गावांत मुख्यालयाला जोडणारे रस्ते नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासींना जाण्यासाठी १५० किमी अंतरापर्यत जावे लागते. येथे गेल्यावर काम होण्याची शास्वती नाही. वेळप्रसंगी मुक्काम करावा लागतो. यामुळे आर्थिक झळही सहन करावी लागते. हा खर्च करण्याची आदिवासी बांधवांची ऐपत नाही. त्यामुळे महाराष्ट्रापासून लागलेल्या बुऱ्हाणपूर, खंडवा आणि बैतूल हे तीन जिल्हे केवळ ८० किलोमीटर अंतरावर असून, तासाभरात संपर्क साधला जाऊ शकतो. हे आमच्यासाठी सोयीचे राहणार असल्यामुळे धारणी तालुक्यातील १५४ गावे मध्य प्रदेशात समाविष्ट करावीत, अशी आमची मागणी असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल यांनी केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनMelghatमेळघाटAmravatiअमरावती