शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या व रखडलेली कामे जलद गतीने मार्गी लावण्याचे अनुषंगाने आता तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी ...

अमरावती : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या व रखडलेली कामे जलद गतीने मार्गी लावण्याचे अनुषंगाने आता तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन केले जाणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा घेऊन सरपंचाकडून गावातील जनतेचे प्रश्न व समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेत धडकला आहे.

ग्रामपंचायतीची कामे वेळेत होत नसल्याबाबत या तक्रारी, निवेदने शासनास प्राप्त होत असतात. याची दखल घेत सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी पंचायत व इतर कर्मचारी संबंधित ग्रामसेवक यांच्याकडून आढावा बैठकीत घेण्यात यावी. ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींची सोडवणूक करावी. ही सभा दर तीन महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी. तक्रार निवारण दिनाला या सभेचे आयोजन करावे, अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

बॉक्स

सीईओंना द्यावा लागणार अहवाल

या सभेनंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसांच्या आत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी या सभेचे अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना द्यावयाचा आहे. विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्ह्यातील झालेल्या सभेचा अनुपालन अहवाल एकत्रितपणे शासनास पुढील दहा दिवसात सादर करावा, असे आदेश यामध्ये सुचविण्यात आले आहे.

कोट

प्रत्येक पंचायत समितीस्तरावर तालुक्यातील सरपंचांची दर तीन महिन्यातून सभा घेण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक आटोपल्यानंतर याबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश बीडीओंना दिले आहेत.

अमोल येडगे

मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद