सरपंच अवॉर्डच्या प्रवेशिकांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:31 IST2019-01-09T22:30:23+5:302019-01-09T22:31:16+5:30
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा तथा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

सरपंच अवॉर्डच्या प्रवेशिकांना प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा तथा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरू केला आहे. गतवर्षी अठरा जिल्ह्यांत ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारांहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़ सरपंचांनी विविध १३ क्षेत्रांत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रात अगोदर जिल्हा व नंतर राज्य स्तरावर आदर्श सरपंचाची निवड करण्यात आली होती. गतवर्षी विजेत्यांच्या गावांसाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या होत्या. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ९९२२४२७७९४ या क्रमांकावर संपर्क करावा.
पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकष
जलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उद्योन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर अशा १३ क्षेत्रांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे, त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. प्रवेशिका ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत.
पुरस्कारासाठीची प्रक्रिया
‘लोकमत’ कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या जातील.
सरपंचांनी या प्रवेशिका भरून पुन्हा कार्यालयात जमा करावयाच्या आहेत.
प्रवेशिकांची छाननी करुन व माहितीची पडताळणी करुन ‘ज्युरी’ (मंडळ) जिल्हा पातळीवरील पुरस्कारांची घोषणा करेल.
प्रथम जिल्हास्तरावर १३ पुरस्कार दिले जातील. त्यानंतर राज्यस्तरीय सोहळ्यात राज्याचे १३ पुरस्कार प्रदान होतील.
अठरा जिल्ह्यांचा समावेश
अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.