शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संततधार : अतोनात नुकसान

By admin | Updated: March 2, 2015 00:29 IST

शनिवार दुपारनंतर आलेल्या वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्ह्याला जबर फटका बसला. सर्वाधिक नुकसान गव्हाचे झाले.

अमरावती : शनिवार दुपारनंतर आलेल्या वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्ह्याला जबर फटका बसला. सर्वाधिक नुकसान गव्हाचे झाले. ओंबीवरचा गहू झोपला, मृग बहराचीा संत्री गळाली, हरभरा, तुरीच्या गंज्या भिझल्या, कपाशीच्या झाडावरील कापूस भिजला, आंब्याचा मोहोर गळाल्याने मोठे नुकसान झाले. टिनपत्राची छत उडाली. अचानक आलेल्या अकाली पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली, मात्र ३७ अंशांवर असलेला पारा खाली आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालिका सुरू आहे.अचानक वातावरण ढगाळ होऊन सुसाट वारा सूुला अन् मोठ्या थेंबांचा पाऊ स बरसण्यास सुरुवात झाली. वादळाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडले, खांब वाकलीत, वीज पडून माणसासह गुरेही ठार झाली. अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. तासभऱ्याच्या या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले. शनिवारपासून सुरू झालेला पाऊ स रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच आहे. अवकाळी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी येणार आहे. या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येवून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संततधार पावसाने तिवसा तालुक्यात ओंबिवर आलेला गहू पडला. त्यामुळे दाना बारीक होणार आहे. हरभऱ्याच्या गंज्या पावसात ओल्या झाल्यात. तुरीचीही तीच गत आहे. मृगबहराची फळे गळून पडली. विदर्भाचा कॅलिफोर्निया समजले जाणाऱ्या वरुड तालुक्यात संत्रा कलमांचे डोळे खचल्याने नर्सरीधारकांचे प्रचंड नुकसान झाले. मृग बहराची फळे गळाली, गहू, हरभरा, कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. धामणगाव तालुक्यात पावसामुळे दीडशे घरांची पडझड झाली असून आठ गावे काळोखात आहेत. शेतीपिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या वादळाने चांदूरबाजार तालुक्यात आंब्याच्या मोहोराचे नुकसान झाले. संत्रा,गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यात वादळामुळे अनेक झाडे कोसळल्याने काही रस्ते बंद झाले होते. मेळघाटातही शनिवारपासून तब्बल १७ तास पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होेता. वादळामुळे मेळघाटातील दूरध्वनीसेवा देखिल खंडित झाली असून विद्युत तारा तुटल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरभरा व गहू सोंगून ठेवला होता. परंतु पावसाच्या सरी सोंगून ठेवलेल्या गंजीवर कोसळल्याने शेतमालाचे घरी येण्यापूर्वीच नुकसान झाले. यंदा खरीप हंगामात सुध्दा प्रचंड नुकसान झाले होते. रबीहंगाम तरी तारेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घातच केला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.