शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

संततधार : अतोनात नुकसान

By admin | Updated: March 2, 2015 00:29 IST

शनिवार दुपारनंतर आलेल्या वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्ह्याला जबर फटका बसला. सर्वाधिक नुकसान गव्हाचे झाले.

अमरावती : शनिवार दुपारनंतर आलेल्या वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्ह्याला जबर फटका बसला. सर्वाधिक नुकसान गव्हाचे झाले. ओंबीवरचा गहू झोपला, मृग बहराचीा संत्री गळाली, हरभरा, तुरीच्या गंज्या भिझल्या, कपाशीच्या झाडावरील कापूस भिजला, आंब्याचा मोहोर गळाल्याने मोठे नुकसान झाले. टिनपत्राची छत उडाली. अचानक आलेल्या अकाली पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली, मात्र ३७ अंशांवर असलेला पारा खाली आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालिका सुरू आहे.अचानक वातावरण ढगाळ होऊन सुसाट वारा सूुला अन् मोठ्या थेंबांचा पाऊ स बरसण्यास सुरुवात झाली. वादळाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडले, खांब वाकलीत, वीज पडून माणसासह गुरेही ठार झाली. अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. तासभऱ्याच्या या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले. शनिवारपासून सुरू झालेला पाऊ स रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच आहे. अवकाळी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी येणार आहे. या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येवून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संततधार पावसाने तिवसा तालुक्यात ओंबिवर आलेला गहू पडला. त्यामुळे दाना बारीक होणार आहे. हरभऱ्याच्या गंज्या पावसात ओल्या झाल्यात. तुरीचीही तीच गत आहे. मृगबहराची फळे गळून पडली. विदर्भाचा कॅलिफोर्निया समजले जाणाऱ्या वरुड तालुक्यात संत्रा कलमांचे डोळे खचल्याने नर्सरीधारकांचे प्रचंड नुकसान झाले. मृग बहराची फळे गळाली, गहू, हरभरा, कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. धामणगाव तालुक्यात पावसामुळे दीडशे घरांची पडझड झाली असून आठ गावे काळोखात आहेत. शेतीपिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या वादळाने चांदूरबाजार तालुक्यात आंब्याच्या मोहोराचे नुकसान झाले. संत्रा,गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यात वादळामुळे अनेक झाडे कोसळल्याने काही रस्ते बंद झाले होते. मेळघाटातही शनिवारपासून तब्बल १७ तास पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होेता. वादळामुळे मेळघाटातील दूरध्वनीसेवा देखिल खंडित झाली असून विद्युत तारा तुटल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरभरा व गहू सोंगून ठेवला होता. परंतु पावसाच्या सरी सोंगून ठेवलेल्या गंजीवर कोसळल्याने शेतमालाचे घरी येण्यापूर्वीच नुकसान झाले. यंदा खरीप हंगामात सुध्दा प्रचंड नुकसान झाले होते. रबीहंगाम तरी तारेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घातच केला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.