शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश रद्द तरीही विद्यार्थ्यांचे शुल्क परत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 19:54 IST

महाविद्यालयांची दादागिरी कोण रोखणार; कुलगुरूंकडून निर्धारित प्रवेश शुल्क  तपासणी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्यांचे शुल्क परत केले जात नाही, हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. एकाच शाखेच्या प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांत वेगवेगळे प्रवेश शुल्क आकारले जात असल्याप्रकरणी चौकशीलादेखील सुरुवात झाली आहे.विद्यापीठाने व्यावसायिक, विनाअनुदानित आणि अनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांची कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून नियमावलीदेखील ठरली आहे. असे असताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३८३ महाविद्यालयांमध्ये एकाच शाखेच्या प्रवेशासाठी वेगवेगळे शुल्क घेतले जात असल्याची बाब महाविद्यालयांच्या माहिती पुस्तिकेवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घेतलेले प्रवेश वैयक्तिक अथवा पालकांच्या बदली कारणांनी ते रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना शुल्काचे नावे घेतलेली रक्कम परत करण्यात येत नाही. एवढेच नव्हे तर प्रवेशाच्यावेळी डोनेशन, विविध शुल्क घेतले जाते. ही रक्कमदेखील प्रवेश रद्द झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना परत केली जात नाही. 

विद्यापीठ नियमानुसार काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास त्याचेकडून शुल्काच्या नावे घेतलेल्या रक्कमेतून जुजबी रक्कम महाविद्यालयाने घेऊन उर्वरित रक्कम परत करणे अनिवार्य आहे. मात्र, प्रवेश रद्द झाल्यामुळे महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले. महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ प्रवेश रद्द करण्यास परवानगी देत नाही. नवीन प्रवेश कुठून आणावे अशा विविध कारणांची यादी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांपुढे प्राचार्यांमार्फत ठेवली जाते. या प्रकाराला अनेक विद्यार्थी बळी पडले आहेत.     महाविद्यालयांमध्ये शुल्क आकारणीच्या रक्कमेबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.  विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्यानंतरही शुल्क परत केले जात नाही. याबाबत तक्रारकर्त्यांनी एखाद्या महाविद्यालयाचे उदाहरण पुराव्यानिशी देणे आवश्यक आहे. याप्रकरणी चौकशी पूर्ण करून कुलगुरुंना अहवाल सादर केला जाईल.-  राजेश जयपूरकर,प्र- कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ      विद्यापीठाने महाविद्यालयांचे माहिती पुस्तिका मागवावी. यात प्रवेशाचे शुल्कात तफावत असल्याची बाब निदर्शनास येईल. महाविद्यालयांना प्रवेश शुल्कात वाढ करायची असल्यास त्यासाठी विद्यापीठातून परवानगी घ्यावी. परस्पर प्रवेश शुल्कात वाढ आणि प्रवेश रद्द झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना रक्कम परत न करणे ही फसवणूक आहे.- दिनेश सूर्यवंशी,  व्यवस्थापन परिषद सदस्य, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षण