शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मध्य प्रदेशातील संगम घाट पोखरला जातोय; वरूड, मोर्शी एसडीओ, तहसीलदारांची भूमिका संशयास्पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 17:23 IST

कलेक्टर साहेब, भूमिका स्पष्ट करा, वाळू तस्करी रोखा

अमरावती : मध्य प्रदेशातील कन्हान आणि महाराष्ट्राच्या सीमेतील वर्धा नदी पात्र पोखरून मोठ्या प्रमाणात ‘झिरो रॉयल्टी’च्या नावे वरूड, मोर्शी येथून थेट अमरावती शहरात अवैध वाळू वाहतूक होत आहे. अलीकडे वाळूतस्करीचे वरूड, मोर्शी हे माहेरघर झाले असून, रात्रीतून नियमबाह्य होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुढाकार घ्यावा, अशी आर्त हाक पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

मध्य प्रदेशातील साैसर येथे मोठ्या प्रमाणात वाळू साठा आहे. या साठ्यातूनच वरूड, मोर्शी पुढे नांदगाव पेठ होत अमरावती येथे ओव्हरलोड वाळूची वाहतूक केली जाते. अवैध वाळू वाहतूक करताना ज्या नावावर वाहने आहेत, त्या नावे ‘झिरो रॉयल्टी’ राहत नसल्याची माहिती आहे. पुसला येथील आरटीओ चेक पोस्ट ओलांडून अतिक्षमेतेने वाळू वाहतूक ही नित्याचीच बाब झाली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरूड आणि मोर्शी तहसील कार्यालयासमोरून दरदिवशी १०० पेक्षा जास्त वाहनांची वाळू होत असताना महसूलचे नायब तहसीलदार नेमके करतात काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध वाळू वाहतुकीतून कोट्यवधींची उलढाल होत असल्याने महसूल, पोलिस आणि आरटीओंना फावत आहे. वाळू तस्करीतून गँगवारची शक्यता असून, ती रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

वाळू तस्करीची रसद वसुलीसाठी नेमणूक

वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. वरूड ते अमरावती या दरम्यान वाळू वाहतुकीची रक्कम वसूल करण्यासाठी महसूल, पोलिस आणि आरटीओंने एका व्यक्तीकडे जबाबदारी सोपविली असल्याची माहिती आहे. पावसाळा सुरू असतानासुद्धा वर्धा आणि कन्हान नदीतून गजराजच्या साहाय्याने वाळूचे नियमबाह्य उपसा सुरूच आहे.

पोलिसांची पेट्रोलिंग कशासाठी?

वरूड, मोर्शी, तिवसा, नांदगाव पेठ या पोलिस ठाण्यादरम्यान अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे सर्वश्रुत आहे. वाळू वाहतूकदारांकडून ओव्हरलोड वाहतुकीची वसुली करण्यासाठी पोलिसांचे रात्रीला पेट्रोलिंगमध्ये कर्तव्य बजावण्यासाठी स्पर्धा सुरू असते. असे असताना ओव्हरलोड वाळू वाहतुकीच्या वाहनांविरुद्ध मात्र कारवाई करण्यात येत नाही. वाळू तस्करीत महसूल, पोलिस आणि आरटीओ अशी साखळी असल्याचे बोलले जात आहे.

ओव्हरलोड वाहनांच्या एक चतुर्थांश दंडाचे काय झाले?

महसूल अथवा आरटीओंनी अवैध रेती वाहतुकीच्या ओव्हरलोड वाहनांना दंड आकारला. मात्र, वाहन मालकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आकारलेल्या दंडापैकी एक चतुर्थांश दंडाची रक्कम भरून वाहने प्रतिज्ञापत्रावर सोडविली. मात्र, दीड वर्ष होऊनही उर्वरित दंडाची रक्कम संबंधित वाहन चालकांनी महसूल विभागाकडे अदा केली नाही. याउलट ही वाहने आजही बिनधास्तपणे अवैध रेती, खनिज वाहतुकीसाठी वापरली जात आहे. साधारणतः १५० ते २०० वाहने दंडाची रक्कम न भरता राजरोसपणे रस्त्यावर धावत आहेत. चालान जारी करून दंड आकारला गेला असताना महसूलचे अधिकारी मात्र 'लक्ष्मी दर्शन' होताच रेती तस्कराची पाठराखण करतात, असाच प्रकार जिल्हाभरात सुरु आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती