शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला; संदिपान भुमरेंची बोचरी टीका

By गणेश वासनिक | Updated: September 24, 2022 21:59 IST

राज्याच्या सत्तासंघर्षावर न्यायालयातून २७ सप्टेंबर रोजी निर्णयाची शक्यता

अमरावती :उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना घरातच बसून होते. कोरोनात ‘राजा घरी, जनता दारोदारी’ अशी स्थिती होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाताच, उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडताना जसे नवरीने माहेर सोडावं. तसा हा ईव्हेंट केला, अशी बोचरी टीका राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी येथे केली.

मुंबई येथे ५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक मंत्री राज्यभरात शिवसेना हिंदुगर्व गर्जना संपर्क यात्रा राबवित आहे. त्या अनुषंगाने शनिवारी अमरावतीत ना.संदिपान भुमरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदात टीकास्त्र सोडले. सत्तेवर असताना वेगवेगळ्या आजारांची कारणे देत कर्तव्यापासून पळ काढला. लोकांशी संपर्क ठेवला नाही. जणू शिवसेना संपली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने रामबाण इलाज करणारा डॉक्टर भेटल्याने आता सर्वांचा आजार बरा होईल, असा टोलाही ना.भुमरे यांनी लगावला.

सत्तासंघर्षावर पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ देणार निर्णय 

आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले, याचा शोध घ्यावा. शिवसेनेचे आमदार, खासदार उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरतमार्गे गुवाहाटीचा मार्ग धरला. आता आम्ही समाधानी आहाेत. कारण मुख्यमंत्री शिंदे आमचा फोन उचलतात. त्यांना आम्ही थेट भेटू शकतो. जनतेची कामे करता येतात. आम्ही गद्दार नाही. आम्ही प्रतिकार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची कास धरली. मात्र, येत्या २७ सप्टेंबर रोजी राज्याच्या सत्ता संघर्षावर न्यायमूर्तीचे पाच घटनापीठ निर्णय देतील, अशी शक्यता ना.भुमरे यांनी वर्तविली.

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे