शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

शाईच्या धसक्याने गर्दी ओसरली

By admin | Updated: November 18, 2016 00:19 IST

नोट बदलविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाई लावण्याच्या रिर्झव्ह बँकेच्या निर्णयाच्या धसक्याने

नोटबंदी : वारंवार नोट बदलण्यासाठी येणाऱ्यांना चापअमरावती : नोट बदलविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाई लावण्याच्या रिर्झव्ह बँकेच्या निर्णयाच्या धसक्याने गुरूवारी बँका व एटीएमसमोरची गर्दी ओसरलेली दिसली, तर दुसरीकडे शहरातील कोणत्याही बँकेत नागरिकांच्या बोटावर शाई लावण्यात आली नसल्याचे दिसले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.केंद्र सरकारने चलनातील पाचशे व एक हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद केल्यामुळे त्या बदलून घेण्यासाठी धनदांडग्यांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. त्याचबरोबर इतरांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याचेही प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. वारंवार त्याच व्यक्ती बँकांमध्ये नोटा बदलविण्यासाठी दिसत होत्या. कमिशन तत्त्वावर हे काम सुरू होते. मात्र मंगळवारी रिझर्व्ह बँकेने नोटा बदलवून घेणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे शहरातील बँकांकडे कुणीही फिरकले नसल्याने गर्दी कमी दिसत होती. नोटबंदीमुळे बँकेच्या रांगेत तासन्तास उभे राहावे लागत आहे. यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याचा फायदा काही दिवसांनंतर नक्कीच मिळणार आहे. आपण नेहमी देवाच्या दर्शनासाठी मंदिराच्या रांगेत उभे राहतोच तसेच आता बँकेच्या रांगेत एकदा उभे राहावे लागले तर काहीच फरक पडत नाही, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून येत आहेत. (प्रतिनिधी)शासनाने नोटा बदलवून देताना नागरिकांच्या हाताच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी तूर्तास झालेली नाही. बोटावर शाई न लावता ५०० व हजारांच्या नोटा स्वीकारल्या जात आहे. - सुनील रामटेके, जिल्हा प्रबंधक, अग्रणी बँककाय म्हणतात नागरिक ?पैसे भरायला यायचे म्हणून आम्ही सकाळपासूनच घरातून निघालो. नंबर लवकर लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु खुप गर्दी आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक काही करू शकत नाही. मोदींचा निर्णय चांगला असल्याने थोडा त्रास झाला तरी चालेल, अशी प्रतिक्रया शोभा कावरे यांनी दिली.नोटबंदी निर्णयाचा मध्यमवर्गीयांना खूप त्रास होत आहे. निर्णय चांगला असल्याने याला साथ देत आहोत. पण सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सुटे पैसे नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गर्दी काही दिवस तशीच राहणार असल्याची प्रतिक्रिया पंजाबराव उके यांनी दिली.