शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

ग्रामीण भागात ‘लालपरी’ रुसलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:12 IST

पान २ लीड नकोशा रस्त्यांनी घात, एकाच दिवशी तीन बस नादुरुस्त, प्रवास करायचा कसा? मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : ...

पान २ लीड

नकोशा रस्त्यांनी घात, एकाच दिवशी तीन बस नादुरुस्त, प्रवास करायचा कसा?

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : सर्वांच्या जिवाभावाची, सुखदुःखात साथ देणारी, ग्रामीण भागाची ‘जीवनवाहिनी’ एसटी बस ग्रामीण भागातील खड्ड्यांच्या रस्त्यावर वारंवार बंद पडत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात एकाच दिवशी तीन बस नादुरुस्त झाल्या. या बसमधून प्रवास करायचा तरी कसा, हा प्रश्न प्रवासी करीत आहेत.

‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी’ ही घोषणा अंमलात आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी गावागावांत पोहचवल्या. लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील दळणवळण सुरळीत झाले. शाळा सुरू झाल्या. मात्र, एसटी बंद आहे. त्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शहरात शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्हा मुख्यालयी एसटी सुरू केल्या. मात्र, त्यांच्या चाकाखालील खड्ड्यांमुळे नादुरुस्त होण्याचे ग्रहण कायम आहे. त्यामुळे दरदिवशी बस रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत आढळून येत आहेत. खराब रस्त्यांमुळे गाडी चालवणे अशक्य होत असल्याच्या तक्रारी अनेकदा चालकांनी परिवहन महामंडळाकडे केल्या आहे.

---------------

एकाच दिवशी तीन बस नादुरुस्त

चांदूर रेल्वे, पुलगाव या उपगाराच्या तीन एसटी बस सोमवारी एकाच दिवशी नादुरुस्त होऊन रस्त्याच्या क़डेला उभ्या झाल्या. वर्धा-अमरावती फेरी करणारी पुलगाव आगाराची एम एच ४० एन ८६०१, याच आगाराची हिंगणघाट-अमरावती फेरी करणारी बस (एम एच ४० एन ८७११) तसेच चांदूर रेल्वे आगाराची एम एच ४० ८६६२ क्रमांकाची बस या तिन्ही धनोडी- चांदूर रेल्वे रस्त्यावर नादुरुस्त पडल्या. यामुळे प्रवाशांना रस्त्यावर एक तास ताटकळत राहण्याची वेळ आली होती. या तिन्ही एसटी सुपरफास्ट होत्या, हे विशेष.

-------------

रस्त्यांनी केली बिकट वाट वर्धा ते अमरावती मार्गातील पुलगाव-देवगाव तसेच चांदूर रेल्वेपर्यंत रस्ता पूर्णतः खड्डेमय आहे. यवतमाळहून देवगाव व धामणगाव हा रस्ता समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पूर्णतः खराब झाला आहे. कुऱ्हा-अंजनसिंगी-धामणगाव या रस्त्यात बांधकामामुळे खड्डे आहेत. या रस्त्याने पायी चालणेही अवघड आहे.

------------

वेग मंदावला, प्रवाशांसाठी आजाराचे ‘गिफ्ट’

खराब रस्त्यामुळे एसटी चालकांच्या त्रास वाढला आहे. खड्ड्यांमुळे एसटीचे भाग आणि स्प्रिंग तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच एसटीचे अनेक भाग जुने व भंगार आहेत. यामुळे वेळापत्रक पाळण्यास अडचण येत आहे. प्रवाशांच्या मान आणि कंबरदुखीचा त्रासही वाढला आहे.