शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सोशल मीडिया नसताना ‘शो कॉज’ची अफवा सुसाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:01 IST

उपायुक्तद्वयांना शो कॉज नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस वर्तुळातून दुजोरा न मिळाल्याने तथाकथितरीत्या शो कॉज बजावण्यात आल्याचे ते ‘तोंडी व्हायरल’ वृत्त कोरी अफवा ठरले.

ठळक मुद्देशहरातील हिंसाचाराची पार्श्वभूमी : पोलीस उपायुक्तद्वयांनी नाकारले वृत्त

अमरावती : शहरात सामान्यांकडे समाजमाध्यम चालवायला इंटरनेट नसताना काल-परवा एका अफवेने चांगलीच उचल घेतली. त्या अफवेचे पीक इतके बहरले की, अफवेचीदेखील दखल घेणे भाग पडले. ते वृत्त वजा अफवा होती. ती उपायुक्तद्वयांना शो कॉज नोटीस बजावण्यात आल्याची. मात्र, पोलीस वर्तुळातून दुजोरा न मिळाल्याने तथाकथितरीत्या शो कॉज बजावण्यात आल्याचे ते ‘तोंडी व्हायरल’ वृत्त कोरी अफवा ठरले. आयुक्तांनी त्या तथाकथित शो कॉजला ‘कोरी अफवा’ असे संबोधले.

शुक्रवार व शनिवारी लागोपाठ घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय क्षेत्रात १३ नोव्हेंबरपासून इंटरनेट बंदी लागू करण्यात आली. जातीय दंगल व हिंसाचाराच्या अंगाने अफवेचे पीक येऊ नये व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊ नयेत, यासाठी गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांच्या परवानगीने इंटरनेट बंदी लागू करण्यात आली.

१९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ नंतर इंटरनेट सेवा पूर्ववत झाली. मात्र त्यापूर्वी एक आश्चर्य घडले. पोलीस आयुक्तांनी उपायुक्तद्वयांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अशी कुजबुज पोलीस आयुक्तालयासह शहरातील ठाण्यातही ऐकायला मिळाली. शहरातील तणावपूर्ण शांततेच्या स्थितीत असे काही शक्य नाही, असा दावा ऐकणाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, संबंधितांनी शो कॉज देण्यात आल्या, त्या का देण्यात आल्या. त्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनांना उजाळा दिला. त्या घटनांच्या अनुषंगाने कुठलाही विभागप्रमुख कारणे दाखवा नोटीस बजावेलच, असा दावादेखील करण्यात आला.

पोलिसांची संख्या नगण्य?

राजकीय पक्षाच्या आरोपानुसार, १२ नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. मात्र, आंदोलकांची संख्या १० हजारांच्या आत असेल, असा पोलिसांचा होरा होता. प्रत्यक्षात त्या दिवशी ४० ते ५० हजार आंदोलक एकत्र आले. त्यापैकी काहींनी दगडफेक व लूटपाट केली. त्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले. त्यावेळी उपायुक्तांकडे सीपींचा प्रभार होता. त्यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना रस्त्यावर उतरावे लागले. शहर पोलीस त्या दिवशी गाफील राहिले, असाही आरोप झाला. त्याच आरोपांची उजळणी करत उपायुक्तद्वयांच्या शो काॅजच्या वृत्ताची सत्यता जोरकसरीत्या पटवून सांगण्यात आली.

ती निव्वळ अफवा आहे. प्राधान्यक्रम आहे. तो आंदोलक व हल्लेखोरांच्या अटकेला. शहरातील शांततेला व संचारबंदीची स्थिती पूर्णपणे निवळण्याला.

- डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीTripuraत्रिपुराPoliceपोलिस