शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आरटीओच्या खात्यात ३९ कोटी ७६ लाखांचे महसूल, अवजड वाहने लक्ष्य, बेकायदेशीर वाहतूक रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:38 IST

अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत कर, वाहन तपासणीतून ३९ कोटी, ७६ लाख ५२ हजार रुपये वसूल करून महसूल खात्यात जमा केले आहे.

अमरावती -  अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत कर, वाहन तपासणीतून ३९ कोटी, ७६ लाख ५२ हजार रुपये वसूल करून महसूल खात्यात जमा केले आहे.आरटीओ कार्यालयाच्यावतीने वर्षभरात चारचाकी वाहनचालकांकडे आॅटो पोल्युशन कंट्रोल पावती, क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक, वाहन परवाना, चालक परवाना, फिटनेस प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अनेक वाहनचालकांकडे कागदपत्रे आढळून आली नाहीत. परिणामी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. १ एप्रिल ते सप्टेंबर २०१७ ला कालखंडात आरटीओच्यावतीने ५०२ वाहने तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहनचालकांकडे पीयूसी, वाहन फिटनेस प्रमाणपत्र, अवजड वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी १४ जणांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच वाहनचालकांकडून तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे. न्यायालयीन दंडासह आरटीओच्या तिजोरीत जमा झाले आहे. तसेच चारचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेषत: क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे वाहनचालक, प्रदूषणयुक्त वाहतूक करणारे, चालक वाहन परवाना नसणे अशा नियमांचे उल्लंघन करणाºया एकूण २१६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १६२ वाहनांवर तडजोडीतून ४ कोटी ३२ लाख ७४८ रुपये  वसूल करण्यात आले आहे. तसेच १४ वाहनचालकांवर न्यायालयीन खटले सुरू आहेत. पीयूसीशिवाय वाहन चालवून पर्यावरणात प्रदूषणाची वाढ करणाºया वाहनचालकांविरुद्ध आरटीओने कारवाईसाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. आरटीओ कार्यालयाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे वाहनचालक आणि नियमबाह्य वाहतूक करणाºयाविरोधात कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. नियमित वाहन तपासणीत ५०२ वाहनांकडून २ कोटी, २२ लाख २०० रुपये वसूल करण्यात आलेत. अवजड वाहतूकप्रकरणी २१६ वाहने तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६२ वाहनचालकांविरुद्ध तडजोड शुल्क असे ४ कोटी ३२ लाख ७४८ रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रादेशिक परिवहन आयुक्तांच्या सूचनेनुसार नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडासह न्यायालयीन कारवाई केली जाईल, अशी तयारी आरटीओ कार्यालयाने चालविली आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहने चालविताना कागदपत्रे जवळ बाळगणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. यापुढे बेकायदेशीर वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा वेग वाढविला जाईल.- विजय काठोडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Policeपोलिस