शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वनक्षेत्रातील रस्त्यांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:19 IST

वन्यजीवांसाठी उपाययोजना : राज्य, राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधकाचा प्रस्ताव 

गणेश वासनिक अमरावती : गत काही वर्षांपासून विदर्भात रस्ते अपघातात वाघ, बिबट, काळवीट, हरिण आदी अन्य वन्यजीवांचे बळी जात असल्याच्या घटनांमुळे वनविभागापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील राज्य, राष्ट्रीय महामार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचा प्रस्ताव असून, त्याअनुषंगाने रस्त्यांची चाचपणी सुरू झाली आहे.राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र हे विदर्भात आहे. त्यापैकी बहुतांश वनक्षेत्र हे राष्ट्रीय व राज्य महामार्गामध्ये विभागले आहे. पेंच, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सुमारे २०० कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग पसरलेला असून, ताडोबा, चिमूर, भद्रावती, ब्रम्हपुरी व बोरमध्ये राज्यमार्ग गेला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या शोधात वन्यजीव बाघ, बिबट रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाखाली येऊन चिरडतात. विदर्भातील वनक्षेत्रातून जाणाºया रस्त्यावरून वन्यजीवांचा बळी हा रात्रीच्या सुमारास जातो, हे विशेष. व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वनक्षेत्रातून जाणाºया रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अपघात प्रवणस्थळी रेडियम, पांढरे पट्टे, नामफलक व गतिरोधक बसविण्याबाबत आदेश जारी केले आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाकपणा करीत असल्याचे चित्र आहे. गुळगुळीत रस्ते ठेवण्याच्या प्रयत्नात वनक्षेत्रातील मार्गावर वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. नागपूर ते गोंदिया हायवे, हिंगणा रिंग ते चिमूर राज्यमार्गावर अनेकदा बिबट, वाघांचा अपघातात मृत्यू झाला. वनक्षेत्रातून जाणाºया राज्य राष्टÑीय महामार्गावर गतिरोधक बसविणे, पांढरे पट्टे मारणेबाबत त्या-त्या भागातील स्थानिक वनाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली  आहे. मात्र, त्यांच्याकडे निधी नसल्याची ओरड ऐकण्यास मिळते. अनेक ठिकाणी गतिरोधक न बसविता निधी मात्र खर्च केल्याचे दाखविले जाते. व्याघ्र संपर्कात प्राधिकरणाच्या नियमावलीचा भंग सार्वजनिक बांधकाम विभाग करताना दिसून येते.

- तर रात्रीच्या वेळी मार्ग बंदकाही वर्षांपासून रस्ता अपघातात वन्यप्राणी ठार होत असल्याने केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने स्थानिक राज्य शासनाने रात्रीच्या वेळी महत्त्वाचे मार्ग बंद करण्यासंदर्भात वनविभागाला चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहे. व्याघ्र प्रकल्पातून जाणारे रस्ते रात्रीच्या काही तासांकरिता टप्प्या- टप्प्याने बंद करण्यात येत आहे. मात्र, याला विरोध होत असल्यामुळे राज्य शासन हे तसे प्रयत्न करण्यास अपयशी ठरत आहे. वनक्षेत्रात दोन्ही बाजूला पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जेणेकरून रात्रीच्या वेळी प्राणी पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडणार नाही, हा यामागील मुख्य उद्देश आहे.कोटनिसर्ग साखळीत वन्यजीव अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे रस्ते अपघातात वन्यजीवांचे बळी जात असतील तर ते रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. त्यानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गाची चाचपणी सुरू आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर