शहराला प्रदूषणाचा धोका
By Admin | Updated: August 24, 2014 23:10 IST2014-08-24T23:10:59+5:302014-08-24T23:10:59+5:30
नजीकच्या सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत सुमारे ६० फूट उंच तयार झालेली कचऱ्याची टेकडी कमी करण्यासाठी जैविक, अजैविक कचरा जाळण्याची शक्कल प्रशासनाने लढविली आहे.

शहराला प्रदूषणाचा धोका
गणेश वासनिक/अमरावती : नजीकच्या सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत सुमारे ६० फूट उंच तयार झालेली कचऱ्याची टेकडी कमी करण्यासाठी जैविक, अजैविक कचरा जाळण्याची शक्कल प्रशासनाने लढविली आहे. मात्र, यामुळे शहराला प्रदूषणाने वेढले असून या जाळलेल्या कचऱ्याच्या धुरातून कार्बनडॉय आॅक्साईड वायू बाहेर पडून हवेत मिसळत असल्याने या भागातील रहिवाशांना ‘कॅन्सर’ सारख्या प्राणघातक आजाराच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही.
पशुंचे प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम
प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या खाण्यात येतात. त्या पोटात विरघळत नाहीत. परिणामी पशुंचे प्रजनन थांबल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी सुधीर गावंडे यांनी दिली.
ंजागतिक आरोग्य संघटनेने दिला धोक्याचा इशारा
प्लास्टिक पदार्थ एकदा जमिनीत पुरले गेले की, ते बाहेर निघत नाहीत. मात्र, या पदार्थांपासून रेटीना, अस्थमा, हृदयरोग, मेंदूचे विकार, लिव्हरचे विकार होत असल्याचा अहवाल १९९० साली जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी अमेरिकेने अनेक उपाययोजना करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.
‘घनकचरा’ व्हावा ‘धनकचरा’
साठविलेल्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करुन जैविक आणि अजैविक कचरा वेगळा करण्यात यावा. जैविक कचऱ्यातून खतनिर्मिती तर अजैविक कचऱ्यातून विजनिर्मिती केल्यास भविष्यात ‘घनकचऱ्याचे रूपांतर धनकचऱ््यात’ झाल्याशिवाय राहणार नाही. या आशयाची मागणी महापालिका उपायुक्त रमेश मवासी यांच्याकडे स्थानिक दुर्गाविहार येथील पर्यावरणप्रेमी नंदकिशोर गांधी यांनी केली आहे.