शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांना वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST

पान ३ वर लिड असाईनमेंट अमरावती : शहरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवतात. वाहतूक नियम पाळत नाहीत. ...

पान ३ वर लिड

असाईनमेंट

अमरावती : शहरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवतात. वाहतूक नियम पाळत नाहीत. ओव्हरसिट प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. यावर नियंत्रण कधी येणार, असा प्रश्न आहे. वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त अनिल कुरळकर यांनी वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोेजना राबविण्यास सुरुवात केली असली तरी ऑटोचालकांच्या पळवापळवीवर नियंत्रण गरजेचे आहे. रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट ही बाब नित्याचीच झाली आहे.

ऑटो रिक्षांमध्ये मुख्यत: तीन प्रवासी घेण्याची मुभा असताना आठ-दहा प्रवासी वाहतूक होते. काही रिक्षाचालकांनी पाठीमागील बाजूस जाळी लावली आहे. त्यातूनही प्रवासी वाहतूक सुरूच असते. काहीजण साऊंड सिस्टिम बाॅक्सवर प्रवासी बसवितात. चौकात चालक सीटवर दोन-तीन प्रवासी बसवून घेतात. वाहतूक पोलीस दिसले की, काही प्रवाशांना उतरवून दिले जाते. पुन्हा परिस्थिती जैसे थे होते.

////////////

या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी

बसस्थानक

येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर, सायकल स्टॅन्डसमोर ऑटो लावले जातात; मात्र येथे वाहतूक पोलीस हजर असतानाही काहींची मनमानी सुरू असते. वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून तीनपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. सात-आठ प्रवासी घेतल्याशिवाय ऑटो सुरूदेखील केली जात नाही.

///////////

रेल्वेस्थानक

अमरावती रेल्वेस्थानकावर सकाळी व सायंकाळी ऑटोचालकांची मोठी संख्या असते. ती सर्व वाहने रेल्वे स्थानकाच्या आतील प्रवेशद्वारासमोर, खेटून उभी केली जातात. या भागातून प्रवाशांची सर्वाधिक पळवापळवी चालते.

////////////

बडनेरा रेल्वेस्थानक

बडनेरा जंक्शनच्या बाहेर पडलो की, चलो अमरावतीचा सूर कानावर आदळतो. येथे अनेकदा ऑटोचालक व प्रवाशांमध्ये वाद झडत असतो. अनेकदा ते वाद आणि प्रवाशांच्या पळवापळवीच्या घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

////////////

प्रवाशांना त्रास

अमरावती बसस्थानकाशेजारी ऑटोसाठी थांबलात की, अनेक ऑटोचालक विचारणा करतात. त्यांच्यातही क्रमांक असतो, हे ऐकिवात आहे. प्रत्येकजण आओ, या म्हणतात. मात्र, सात-आठ प्रवासी झाल्याशिवाय ऑटो जागचा हलतदेखील नाही.

नरेंद्र कडू, प्रवासी

//////////

एकदा राजापेठमार्गे अकोली जात असताना स्पेशल ऑटो ठरविला. २०० रुपये भाडेदेखील दिले. मात्र, ऑटोचालकाने मध्यंतरीच्या प्रवासात राजकमल, राजापेठ व साईनगर भागातून प्रवासी घेतले. पैसे पूर्णच घेतले. कुणाकडे तक्रार करायची?

- सुधीर तायडे, प्रवासी

////////////

मनमानी भाडे

१) शहरात अनेक ठिकाणी वेळेनुसार वेगवेगळी भाडे आकारणी केली जाते.

२) रात्रीच्या वेळी मनमानी भाडे आकारले जाते.

३) ऑटोचालकनिहाय दर बदलले असतात. त्याचा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो.

४) अमरावती रेल्वे स्थानकावर सकाळी वेगवेेगळे ऑटोचालक मनमानी भाडे सांगतात.

५) नकार दिल्यास ‘पहिली बार जा रहे क्या’ असा टोमणा बऱ्याचदा मारला जातो.

/////////////

तर ऑटोचालकांवर कारवाई....

ऑटोचालकांसाठी निश्चित असे वाहतूक नियम आहेत. कायद्याचे पालन न केल्यास संबंधितांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. शहरातील वाहतूक व्यवस्था ‘नीट ॲन्ड क्लीन’ करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोतच. बेशिस्त ऑटोचालकांना समज दिली जाईल.

- अनिल कुरळकर, प्रभारी सहायक आयुक्त

वाहतूक शाखा

////////////