शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत नव्या सभासदांना संधी न दिल्यास राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:00 IST

संस्थेच्या घटनेमध्ये तरतूद नसल्यामुळे नव्या सभासदांची नोंदणी करता येत नाही, अशी दिशाभूल आजवर प्रस्थापितांनी केली.

ठळक मुद्देबाळासाहेब सपकाळ : उपविधीच्या नावाआड प्रस्थापितांचे राजकारण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संस्थेच्या घटनेमध्ये तरतूद नसल्यामुळे नव्या सभासदांची नोंदणी करता येत नाही, अशी दिशाभूल आजवर प्रस्थापितांनी केली.मात्र भाऊसाहेबांच्या निधनानंतर १९७६ मध्ये घटनेची दुरूस्ती कशी केली, असा सवाल विकास पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जगताप यांनी शुक्रवारी केला. आम्ही दोन वर्षात नव्या सभासदांची नोंदणी करू, अन्यथा राजीनामा देवू असे अभिवचन त्यांनी दर्यापूर, मुर्तिजापूर, अकोट व अकोला येथील सभेत दिले. शिवपरिवारातील आजिवन सदस्यांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते.भाऊसाहेबांच्या निधनानंतर १९६७ मध्ये घटनादुरूस्ती करण्यात आली. तीच घटना आज अस्तित्वात आहे. याच घटनेत १९७६ मध्ये नवीन सभासदांची नोंदणी करण्यात आली. मात्र सोयीच्या राजकारणासाठी घटनेत तरतूद नसल्यामुळेच नवीन सभासद नोंदणी करता येत नाही, असे सांगत प्रस्थापितांनी आजवर शिवपरिवाराची दिशाभूल केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. नवीन सभासदांची नोंदणी टाळणे हे प्रस्थापितांचे सोयीचे राजकारण आहे. निवडणुका आल्या की विविध पॅनेल व उमेदवार नव्या सभासदांची नोंदणी करण्याचे आश्वासन देतात, नंतर त्यांना विसर पडतो. भूलथापा देणे व स्वार्थ साधने असेच आजवर होत आले आहे. आजीवन सभासदांमध्ये या विषयासंदर्भात विश्वसनियतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्यावर एकदा विश्वास टाकून बहुमताने निवडून द्या, दोन वर्षांच्या आत नवीन सभासदांची नोंदणी करू, अन्यथा संपूर्ण विकास पॅनेल राजीनामा देईल, हाच आमचा वचननामा आहे, अशी निर्धारपूर्वक ग्वाही सपकाळ यांनी दिली. उपस्थितांनी त्यांच्या या महत्त्वपूर्ण मुद्द्याला भरभरून दाद दिली. डी.एम.वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकोट येथील संवाद सभेला जेष्ठ सभासद माणिकराव पोटे, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार गजाननराव इंगोले, जगन्नाथ वानखडे, उत्तमराव यादगीरे, कोषाध्यक्षपदाचे राजीव इंगोले, सदस्यपदाचे उमेदवार बाबासाहेब घोरपडे, मोहनराव जायले, बाळासाहेब वैद्य, नीळकंठराव आंडे आदी उपस्थित होते.भाऊसाहेबांच्या भावनांचा विसरभाऊसाहेबांनी ज्या भावनेने शिवपरिवाराची स्थापना केली त्याचा सोईस्कर विसर प्रस्थापितांना पडला आहे. सतत दिशाभूल करण्यात येत असल्याने वेळीच सर्व सभासदांनी सावध राहावे, असे भावनिक आवाहन संस्थेचे अकोट येथील ९५ वर्षांचे वयोवृद्ध सभासद माणिकराव पोटे यांनी केले. या निवडणूक निमित्याने युवा पिढीचा सहभाग घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी प्रस्थापितांवर बोचरी टीका केली.