शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

दोन वर्षांत नव्या सभासदांना संधी न दिल्यास राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:00 IST

संस्थेच्या घटनेमध्ये तरतूद नसल्यामुळे नव्या सभासदांची नोंदणी करता येत नाही, अशी दिशाभूल आजवर प्रस्थापितांनी केली.

ठळक मुद्देबाळासाहेब सपकाळ : उपविधीच्या नावाआड प्रस्थापितांचे राजकारण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संस्थेच्या घटनेमध्ये तरतूद नसल्यामुळे नव्या सभासदांची नोंदणी करता येत नाही, अशी दिशाभूल आजवर प्रस्थापितांनी केली.मात्र भाऊसाहेबांच्या निधनानंतर १९७६ मध्ये घटनेची दुरूस्ती कशी केली, असा सवाल विकास पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जगताप यांनी शुक्रवारी केला. आम्ही दोन वर्षात नव्या सभासदांची नोंदणी करू, अन्यथा राजीनामा देवू असे अभिवचन त्यांनी दर्यापूर, मुर्तिजापूर, अकोट व अकोला येथील सभेत दिले. शिवपरिवारातील आजिवन सदस्यांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते.भाऊसाहेबांच्या निधनानंतर १९६७ मध्ये घटनादुरूस्ती करण्यात आली. तीच घटना आज अस्तित्वात आहे. याच घटनेत १९७६ मध्ये नवीन सभासदांची नोंदणी करण्यात आली. मात्र सोयीच्या राजकारणासाठी घटनेत तरतूद नसल्यामुळेच नवीन सभासद नोंदणी करता येत नाही, असे सांगत प्रस्थापितांनी आजवर शिवपरिवाराची दिशाभूल केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. नवीन सभासदांची नोंदणी टाळणे हे प्रस्थापितांचे सोयीचे राजकारण आहे. निवडणुका आल्या की विविध पॅनेल व उमेदवार नव्या सभासदांची नोंदणी करण्याचे आश्वासन देतात, नंतर त्यांना विसर पडतो. भूलथापा देणे व स्वार्थ साधने असेच आजवर होत आले आहे. आजीवन सभासदांमध्ये या विषयासंदर्भात विश्वसनियतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्यावर एकदा विश्वास टाकून बहुमताने निवडून द्या, दोन वर्षांच्या आत नवीन सभासदांची नोंदणी करू, अन्यथा संपूर्ण विकास पॅनेल राजीनामा देईल, हाच आमचा वचननामा आहे, अशी निर्धारपूर्वक ग्वाही सपकाळ यांनी दिली. उपस्थितांनी त्यांच्या या महत्त्वपूर्ण मुद्द्याला भरभरून दाद दिली. डी.एम.वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकोट येथील संवाद सभेला जेष्ठ सभासद माणिकराव पोटे, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार गजाननराव इंगोले, जगन्नाथ वानखडे, उत्तमराव यादगीरे, कोषाध्यक्षपदाचे राजीव इंगोले, सदस्यपदाचे उमेदवार बाबासाहेब घोरपडे, मोहनराव जायले, बाळासाहेब वैद्य, नीळकंठराव आंडे आदी उपस्थित होते.भाऊसाहेबांच्या भावनांचा विसरभाऊसाहेबांनी ज्या भावनेने शिवपरिवाराची स्थापना केली त्याचा सोईस्कर विसर प्रस्थापितांना पडला आहे. सतत दिशाभूल करण्यात येत असल्याने वेळीच सर्व सभासदांनी सावध राहावे, असे भावनिक आवाहन संस्थेचे अकोट येथील ९५ वर्षांचे वयोवृद्ध सभासद माणिकराव पोटे यांनी केले. या निवडणूक निमित्याने युवा पिढीचा सहभाग घेण्याची वेळ आली असल्याचे सांगत त्यांनी प्रस्थापितांवर बोचरी टीका केली.