शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

पुनर्वसितांना जमीन निवडीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:00 PM

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात पुनर्वसित भागातून मूळ गावी परतलेल्या आदिवासींशी शुक्रवारी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संवाद साधला.

ठळक मुद्देआदिवासींशी संवाद : खासदार, पालकमंत्री, आमदारांचा संयुक्त दौरा

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात पुनर्वसित भागातून मूळ गावी परतलेल्या आदिवासींशी शुक्रवारी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संवाद साधला. आदिवासींना जमीन निवडण्याची संधी शासनाने दिली असल्याचे यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले.चिखलदरा तालुक्यातील केलपाणी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजतानंतर आदिवासी व प्रशासनात संवाद साधण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, अचलपूरचे आमदार बच्चू कडू, अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.मी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधीअमरावती येथे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर सायंकाळी पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी मेळघाटाकडे कूच केली. पालकमंत्री पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिनिधी असल्याचा दाखला दिला.ते म्हणाले, आदिवासींच्या जमिनीची मागणी पूर्ण करण्यासाठी शासननिर्णय काढण्यात आला आहे. अमरावती व अकोला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाटपासाठीची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या जमिनीपैकी योग्य वाटेल ती जमीन निवडण्याची संधीही पुनर्वसितांना मिळेल. पुनर्वसन पॅकेज दिल्यानंतर पुन्हा जमीन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचेही ते म्हणाले. यावेळी खासदार अडसूळ यांच्यासह सर्वच उपस्थितांनी आदिवासींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रात्री ३ वाजतापर्यंत सर्व मंडळी केलापाणी येथे ठाण मांडून होती.नोकरी मिळणार, सहकार्य कराबच्चू कडू यांनी ‘व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसितांना जमीन मिळवून देण्यासाठीचा शासननिर्णय महत्त्वाचा आहे. पेसा अंतर्गत भरती करण्यासाठी आदिवासी बांधवांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. त्यातून नोकरी मिळवून देण्याचीही प्रशासनाची तयारी आहे’, असे मत व्यक्त केले. पुनर्वसित बांधवांनी या निर्णयाचा आदर राखून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केले.