बीपीएल धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: December 13, 2014 00:37 IST2014-12-13T00:37:00+5:302014-12-13T00:37:00+5:30
वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

बीपीएल धारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : वडाळी परिसरातील बीपीएल लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळ्ण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना या योजनेचा लाभ द्यावा, या मागणीचे निवेदन नुकतेच येथील त्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी वडाळी, देवीनगर, प्रबुध्दनगर, गजानननगर येथील शेकडो नागरिक उपस्थित होते. वडाळी परिसरातील अनेक कष्टकरी व मजूर आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नवीन रेशनकार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या नागरिकांसाठी असलेल्या नमुना अ मिळविण्याचा कालावधी वाढवून देणे, रेशन कार्डातून नाव कमी करणे, मुलांच नावे समाविष्ट करणे, दुय्यम पत्रिका देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
वर्ष २००५-०६ मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्वेक्षणामधून अनेक गरीब कुटुंबांची नावे वगळण्यात आली होती. त्यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविला. ज्या कुटुंबांजवळ दारिद्रय रेषेचे कार्ड नाही, त्या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजना व इतर योजनांपासून वंचित रहावे लागते. अशा सर्व जाती, प्रवर्गातील सर्व आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांची नावे दारिद्रय रेषेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना परिसरातील त्रस्त नागरिक संजय चव्हाण, रामेश्वर आंबेकर, सैयद अख्तर मदारी, अमोल गोफणे, राकेश उसरेटे, राजू व्यवहारे, प्रमोद राऊत, संजय वानखडे, राजेश मुंजाडे, बाळासाहेब जेवडे, सागर खुळे, आरिफ खाँ मदारी, शिवदास गायकवाड, कल्पना वैद्य, शालिनी टाके, प्रणिती दिवे, कविता गंडेवार, ललिता आंबेकर, शशिकला वानखडे, कविता बेनिवाल सचिन काकिरवार, पंकज गुहे, विलास बोस, जानराव बनसोेड आदी उपस्थित होते. रेशन कार्डशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवून नवीन रेशनकार्ड तसेच दारिद्रय रेषा प्रमाणपत्र वडाळी तसेच परिसरातील गोरगरीब नागरिकांना तातडीने वितरीत करावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक संतप्त नागरिक उपस्थित होेते.