शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:34+5:302021-03-28T04:12:34+5:30
किसान सभेचे, आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकारचे प्रयत्न नांदगाव खंडेश्वर : शेती व शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान ...

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
किसान सभेचे, आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकारचे प्रयत्न
नांदगाव खंडेश्वर : शेती व शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंद आंदोलनाला प्रतिसाद देत नांदगाव खंडेश्वर येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे व प्रस्तावित वीज सुधारणा कायदा पूर्णपणे शेती व शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी चार महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आदोलन सुरू आहे. पण केंद्रातील सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप होत आहे.
या कृषी कायदयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन किसान सभेचे राज्य कौंसिल सदस्य कॉ. सुनील मेटकर यांनी केले. किसान सभा, महिला फेडरेशन, शेतमजूर युनियन, एआयएसएफ, एआयवायएफ संघटनेचे कार्यकर्ते अंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी संतोष सुरजुसे, विनोद त-हेकर, विनोद वैद्य, ओमप्रकाश सावळे, माधव ढोके, इस्राईल शहा, समीर शहा, अमोल राजकुळे, प्रफुल्ल देशमुख, हरिदास राजगिरे, विनोद वैद्य, योगेश अवझाडे, लक्ष्मण भगवे, सागर कोल्हे, अजय सुलताने, सोनाली वैद्य, चित्रा वंजारी, दीक्षिता त-हेकर, बाबाराव इंगळे, भानुदास मंदुरकर, मोरेश्वर वंजारी, सोनाली साखरवाडे, अंकुश वैद्य, रवींद्र तलवारे, मनोज वानखडे, तुकाराम भलावी, नंदू गाडगे, पुंडलिक बावनकुळे, प्रज्ज्वल ढोके, विकास दादरवाडे, घनश्याम कळंबे, मनोहर तरडे आदींची उपस्थिती होती.
-------