साडेचार लाख शेतकऱ्यांना दिलासा

By Admin | Updated: December 13, 2014 00:35 IST2014-12-13T00:35:51+5:302014-12-13T00:35:51+5:30

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.

Remedies to 4.5 lakh farmers | साडेचार लाख शेतकऱ्यांना दिलासा

साडेचार लाख शेतकऱ्यांना दिलासा

गजानन मोहोड अमरावती
विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे. १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांचे खरीप २०१४ साठीचे ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजार पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे. दुष्काळसदृश स्थितीसाठी प्रचलित निकषाप्रमाणे हेक्टरी ४५०० रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल.
जिल्ह्यातील ४१४ परवानाधारक सावकारांनी ९ डिसेंबर २०१४ पर्यंत वाटलेल्या १३२ कोटी ५३ लाख रुपयांपैकी ७/१२ च्या आधारे घेतलेल्या पीक कर्जाचा शासनाद्वारे भरणा होणार आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यामधील वीज बिलांचा भरणादेखील शासन करणार आहे.
खरिपाचे पीक कर्जावरील व्याज माफ
जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५८ हजार ४८५ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ९३ लाख ८७ हजार, राष्ट्रीयीकृत बँकेचे ६१ हजार २७८ शेतकऱ्यांचे ६७८ कोटी ३३ लाख व ग्रामीण बँकांचे ८०० शेतकऱ्यांना देण्यात आलेले ७१२ कोटी रुपयांचे एकूण ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांच्या खरीप पीक कर्जावरील व्याजाचा भरणा शासन करणार आहे.
१३२ कोटींमधील सावकारी कर्ज माफ
जिल्ह्यात ४१४ परवानाधारक सावकार आहेत. यापैकी शेतीच्या ७/१२ उताऱ्याच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतलेले एकूण १३२ कोटी ५३ रुपयांपैकी असणाऱ्या पीक कर्जाचा भरणा शासन करणार आहे. या सावकारांनी ९ डिसेंबर२०१४ पर्यंत कर्ज वितरित केलेले आहे. यातील केवळ पीककर्जाचा भरणा शासन करणार आहे.

Web Title: Remedies to 4.5 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.