सोशल मीडियावर पावसासाठी आर्जव
By Admin | Updated: July 21, 2015 00:12 IST2015-07-21T00:12:47+5:302015-07-21T00:12:47+5:30
यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत ८५ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. मात्र पेरणीपश्चात पावसाने प्रदीर्घ दडी मारली.

सोशल मीडियावर पावसासाठी आर्जव
विठुरायांना साकडे : दुबार पेरणीचं शेतकऱ्यांचं दु:ख केलं जातंय ‘शेअर’
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सद्यस्थितीत ८५ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. मात्र पेरणीपश्चात पावसाने प्रदीर्घ दडी मारली. यामुळे रोपे माना टाकताहेत. जमिनीतील बिजांकुर करपले जात आहे. पावसामुळे बळीराजाची दैना उडाली आहे.
पाऊस पडावा म्हणून गावागावात ‘धोंडी’ निघत असताना पाऊस पडावा व बळीराजा सुखी व्हावा यासाठी वरुण राजाला ‘सोशल मिडीयावर’ आर्जव केली जात आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाला विविध गंभीर पोष्टव्दारे आर्जव करताना युवा पिढी सरसावली आहे. विशेष म्हणजे दुबार पेरणीच बळीराजावर आलेले संकट हजारोंच्या संख्येत ‘शेअर’ केल्या जात आहे.
अलिकडेच आषाढीला पंढरीला जाणाऱ्या वारीत युवा पिढी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होत आहे.
आभाळ गेलयं चोरीला
शेतावरचं आभाळं चोरीला गेल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांची गोष्ट सध्या सोशल मिडीयात खुप धूम करत आहे. आभाळा चोरीला गेल्यापासून कुणी उधार देत नाही, घरात खायला काही नाही, असे शेतकरी ठाणेदाराला सांगतो, ही तक्रार ठाणेदार नोंदवून घेत नाही. वैतागून तो शेतकऱ्याला कोठडीत टाकण्याची धमकी देतो, शेतकरी म्हणतो, ‘थांबा साहेब’ माझ्या बायको पोरांनाही बोलावून घेतो. संगळ्यांनाच जेलमध्ये टाका, तिथे आम्हाला खायला तर मिळेल ना?.