शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

जमीन अधिग्रहणाचा पाचपट मोबदला

By admin | Updated: May 1, 2017 00:17 IST

शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना पूर्वी दीडचा गुणक असल्याने शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पावणेचार पट मिळत होता ....

समृद्धी प्रकल्प : ओलिताच्या जमिनीस ७५ लाख, कोरडवाहूस ५ लाखनांदगाव खंडेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना पूर्वी दीडचा गुणक असल्याने शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पावणेचार पट मिळत होता परंतु आता दोनचा गुणक लागू झाल्याने शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाच पट मिळणार आहे. महाराष्ट्र समृद्धी प्रकल्पात अधिग्रहीत होणाऱ्या शेतजमिनीचा मोबदला ओलीत जमिनीस हेक्टरी ७५ लाख तर कोरडवाहू शेतजमिनीस हेक्टरी ५० लाख रूपये मिळणार असल्याचे शासन आदेश निर्गर्मित झाले आहे. किसान स्वराजच्या सततच्या पाठपुराव्याची फलश्रृती मिळाली असल्याचे किसान स्वराज आंदोलनाचे संयोजक प्रमोद तऱ्हेकर यांनी सांगितले.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गात शेतजमिनी अधिग्रहणसंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देताना महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार बाजारभावाच्या पावणे चारपट शेत जमिनीचा मोबदला मिळणार असल्याचे सांगत होते. परंतु भूसंपादन कायद्यामधील ज्या केंद्रीय तरतूदी आहे त्यानुसार शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट मिळणे गरजेचे होते. त्यासाठी किसान स्वराजच्या माध्यमातून २७ डिसेंबर २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना पुराव्यासह कागदपत्र सादर करण्यात आले. याबाबत ७ जानेवारीला पालकमंत्र्यांसोबतसुद्धा चर्चा करण्यात आली व वारंवार महसूल विभागाकडे शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक बोलावून ९ फेब्रुवारी २०१७ च्या केंद्रीय सुधारणानुसार तत्वत: मान्यता दिली व २४ एप्रिल २०१७ ला शासन निर्णय घेऊन महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये ९ फेब्रुवारी २०१७ च्या पत्रानुसार गुणांक वाढवण्यात आला त्यामुळे आता महामार्ग प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाच पट मिळणार आहे. म्हणजेच पूर्वीच्या बाजारभावाच्या व गुणांकाच्या तुलनेत आता शेतकऱ्यांना वाढीव गुणांक व वाढीव बाजारभावामुळे एकरामागे ३ ते ५ लाखांचा अतिरिक्त लाभ मिळणार असल्याचे किसान जलस्वराज्य आंदोलनाचे संयोजक प्रमोद तऱ्हेकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)नांदगावात शेतकऱ्यांना १२५ कोटींचा अतिरिक्त लाभशेतजमीन अधिग्रहित करताना पूर्वी बाजारभावाच्या पावणे चारपट मोबदला दिला जात होता. परंतु आता गुणांक वाढल्याने शेतजमिनीचा मोबदला बाजारभावाच्या पाचपट झाला असून नांदगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केल्या जात आहे त्यांना बाजारभावाच्या पाचपट वाढीचा लाभ मिळणार असून १२५ कोटीचा अतिरिक्त लाभ नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच समृद्धी कॅरिडोर प्रकल्पात नागपूर ते मुंबईपर्यंत महागाईत ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन जात आहे त्यांना दोन हजार कोटींचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.