शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थ तळण्याकरिता तेलाचा सर्रास पुनर्वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:49 IST

एकदा कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरिता घातलेल्या तेलाचा वारंवार वापर केला जात असल्याची बाब सर्वत्र पाहावयास मिळते. हा नागरिकांच्या जीविताशी खेळच आहे. अन्न प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी होत नसल्याने नव्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देएफडीएचे दुर्लक्ष : अंबानगरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, जिल्हाभरात नियमांची पायमल्ली

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकदा कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरिता घातलेल्या तेलाचा वारंवार वापर केला जात असल्याची बाब सर्वत्र पाहावयास मिळते. हा नागरिकांच्या जीविताशी खेळच आहे. अन्न प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी होत नसल्याने नव्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याची बाब पुढे आली आहे.अमरावती शहरातील चौकाचौकांमध्ये फास्ट फूड व जंक फूडचे स्टॉल लागलेले आहेत. त्यांच्यासह हॉटेल, रेस्टाँरेंट आणि फेरीवाल्यांकडे खाद्यपदार्थ तयार करताना तेलाचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर होतो. एकदा तळणासाठी घातलेले तेल वारंवार वापरणे आरोग्याकरिता हानिकारक असल्याने १ मार्चपासून शासनाने जळालेल्या तेलाच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीच्या सूचनेवरून सदर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा हॉटेलमध्ये वारंवार खाद्यपदार्थ तळण्याकरिता त्याच त्या तेलाचा वापर नियमबाह्य ठरतो. त्याअनुषंगाने कारवाया अपेक्षित आहे. पण, गेल्या वर्षभरात यासंदर्भाची मोहीम अन्न प्रशासन विभागाने राबविली नसल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त लहान-मोठे हॉटेल व खाद्यपदार्थांचे रेस्टॉरेंट आहेत तसेच हजारो हातगाड्यांवर खाद्यपदार्थ तयार केले जातात. पुनर्वापर केलेल्या तेलाने तळलेले खाद्यपदार्थ सेवन करणे, आरोग्याकरिता अतिशय हानिकारक असून, यासंदर्भाचा कायदेशीर नियम लागू झाला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देशही शासनाने अन्न व प्रशासन विभागाला दिले आहेत. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने हा प्रकार जोमाने सुरू असल्याची बाब समोर आली आहे.हॉटेलांना ठेवाव्या लागणार नोंदीखाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर आरोग्यासाठी घातक आहे. एक किंवा दोनदा वापरल्यावर जळालेल्या तेलात ट्रान्सफॅट ( घातक मेद, चरबी) मोठ्या प्रमाणांत तयार होते. त्याचे सातत्याने सेवन केल्यास हृदयविकार तसेच मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका बळावतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यामुळे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी आॅफ इंडियाच्या सूचनेवरून सरकारने १ मार्च २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत. हॉटेल वा रेस्टॉरेंटमध्ये यापुढे खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर करता येणार नाही. दिवसाला ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाच्या वापर करणारे हॉटेल तेलाच्या वापराचे रेकॉर्ड ठेवतील. खाद्यतेलाची खरेदी, त्याचा किती प्रमाणात वापर केला, वापरलेले तेल पुन्हा तळणासाठी घेतले आहे का, यासंदर्भातील माहिती ठेवावी लागणार आहे. ५० लिटरपेक्षा कमी प्रमाणात तेलाचा वापर करणाऱ्यांना नोंदी ठेवणे बंधनकारक नसले तरी निर्देशांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहणार आहे.पुनर्वापर तीन वेळापेक्षा जास्त नकोतेलाचा पुनर्वापर वारंवार झाल्यास पॉलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कंम्पाऊंडचे प्रमाण वाढते. तेलात हे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नको, असा हा नवीन नियम आहे.तेलाचा पुनर्वापर केला जात असेल, तर कारवाई केली जाईल. यासंदर्भात नेमके काय दिशानिर्देश आहेत, हेदेखील तपासले जाणार आहे.- सचिन केदारेसहायक आयुक्त, अन्न (अमरावती)तेलाचा पुनर्वापर होत असलेले खाद्यपदार्थ सेवन केल्याने फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. असे पदार्थ नियमित खाल्ल्याने पोटाचे विकारसुद्धा बळावतात.- मनोज निचत,हृदय व मधुमेह विकार तज्ज्ञ, अमरावती