शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मूल्यांकनात तफावत ठेवणारे ‘व्हॅल्यूअर’ रडारवर, दंडात्मक कारवाईसह सेवापुस्तिकेत नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 7:53 PM

यंदा बी.कॉम., बी.एस्सी., बी.ए. शाखांमध्ये सर्वाधिक मोठी विद्यार्थिसंख्या आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यंदा उन्हाळी २०१९ परीक्षेच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी गोपनीय विभागाकडून पुनर्मूल्यांकनाअंती मूल्यांकनात तफावत ठेवणा-या ‘व्हॅल्यूअर’विरुद्ध नियमानुसार कारवाई होणार आहे. निकालात त्रुटी, मूल्यांकनात घोळ असल्याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा ओघ वाढलेला आहे. 

यंदा बी.कॉम., बी.एस्सी., बी.ए. शाखांमध्ये सर्वाधिक मोठी विद्यार्थिसंख्या आहे. याच शाखांमध्ये निकालात उणिवा असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा विभागाने विद्यापीठ कायद्यान्वये मूल्यांकन निदेशातील तरतुदीनुसार मूल्यांकनात तफावत ठेवणारे ‘व्हॅल्यूअर’ यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हल्ली पुनर्मूल्यांकन वेगवान पद्धतीने केले जात आहे.

मूळ मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनानंतरचे गुण याची पडताळणी केली जाणार आहे. १६ टक्क्यांपेक्षा अधिक गुण वाढल्यास याबाबत दोषी ‘व्हॅल्यूअर’विरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. परीक्षा विभागाने गोपनीय विभागाला त्याअनुषंगाने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत किती ‘व्हॅल्यूअर’विरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाते, याकडे नजरा लागल्या आहेत.

पुनर्मूल्यांकनात १६ टक्क्यांवर गुण वाढल्यास त्या पेपरचे पुन्हा मूल्यांकन केले जाते. पहिल्या व दुसºया ‘व्हॅल्यूअर’ने दिलेल्या गुणांची पडताळणी केली जाते. दोषी असलेल्या ‘व्हॅल्यूअर’कडून पाच हजरांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :Amravatiअमरावती