शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ‘हालचालीं’ची नोंद

By admin | Updated: April 12, 2017 00:38 IST

कार्यालयीन वेळेत प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हालचालींची तसेच कर्मचाऱ्याला त्याचा विभाग वा कार्यालय सोडण्यापूर्वी तो कुठे जाणार आहे,

रजिस्टरची पूर्तता अनिवार्य : प्रशासकीय शिस्तीचा आदेशअमरावती : कार्यालयीन वेळेत प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हालचालींची तसेच कर्मचाऱ्याला त्याचा विभाग वा कार्यालय सोडण्यापूर्वी तो कुठे जाणार आहे, याची नोंद ठेवावी लागणार आहे. यावर संबंधित विभागप्रमुखांची करडी नजर राहणार आहे. प्रत्येक कर्मचारी-अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावा, यासाठी हा नवा आदेश पारित करण्यात आला आहे. बहुतांश कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडतात. ते थेट सायंकाळीच उगवतात. अनेकजण कार्यालयीन वेळेत पानटपरीवरही दिसतात. हे टाळण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. १२३ पेक्षा अधिक लेटलतीफ अधिकारी- कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतनकपात केल्यानंतर हा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. २४ पेक्षा अधिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर ५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा ‘वॉच’ राहणार आहे. महापालिकेच्या अख्त्यारितील २४ विभागांची झाडाझडती घेण्यासाठी सोमवार ते शनिवार वेळपत्रक आखून दिले आहे. सोमवारी पर्यावरण अधिकारी महेश देशमुख हे जीएडीमधील उपस्थिती पाहतील तर शनिवारी ही जबाबदारी स्वप्निल जसवंते यांच्याकडे देण्यात आले आहे. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे २४ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन वेळेबाबत शिस्त निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये, सर्व शासकीय आणि नागरिकांची कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत, याबाबी विचारात घेऊन नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. (प्रतिनिधी)असा आहे आदेश नेमून दिलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रथम त्यांच्या कार्यालयामधील हजेरीपत्रात स्वाक्षरी करावी. सोबतच्या तक्त्यात नेमून दिल्याप्रमाणे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजता नेमून दिलेल्या विभागास भेट देऊन तपासणीच्या वेळी अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावासमोर हजेरी बुकवर लाल पेनाने खुण करावी व त्याखाली स्वाक्षरी करावीसकाळी १० वाजता भेट देऊन तपासणी केल्यानंतर त्याच कार्यालयात दिवसभरात कोणत्याही वेळी अचानक भेट देऊन तेथील हालचाल रजिस्टरची तपासणी करावी. जे कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असतील व त्यांनी नोंदवहीत नोंद घेतली नसेल तर अशा कर्मचाऱ्यांचे त्यादिवसाचे विनावेतन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. नियुक्त अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा त्या विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यविवरण नोंदवही तपासावी.संबंधित कर्मचाऱ्याकडे किती संदर्भ प्राप्त झाले, त्यापैकी कितीचा निपटारा केला व किती संदर्भ प्रलंबित आहेत, याचा आढावा घ्यावा. कुठल्याही कार्यवाहीविना नस्ती अकारण प्रलंबित असल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी.