शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ‘हालचालीं’ची नोंद

By admin | Updated: April 12, 2017 00:38 IST

कार्यालयीन वेळेत प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हालचालींची तसेच कर्मचाऱ्याला त्याचा विभाग वा कार्यालय सोडण्यापूर्वी तो कुठे जाणार आहे,

रजिस्टरची पूर्तता अनिवार्य : प्रशासकीय शिस्तीचा आदेशअमरावती : कार्यालयीन वेळेत प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हालचालींची तसेच कर्मचाऱ्याला त्याचा विभाग वा कार्यालय सोडण्यापूर्वी तो कुठे जाणार आहे, याची नोंद ठेवावी लागणार आहे. यावर संबंधित विभागप्रमुखांची करडी नजर राहणार आहे. प्रत्येक कर्मचारी-अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावा, यासाठी हा नवा आदेश पारित करण्यात आला आहे. बहुतांश कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडतात. ते थेट सायंकाळीच उगवतात. अनेकजण कार्यालयीन वेळेत पानटपरीवरही दिसतात. हे टाळण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. १२३ पेक्षा अधिक लेटलतीफ अधिकारी- कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतनकपात केल्यानंतर हा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. २४ पेक्षा अधिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर ५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा ‘वॉच’ राहणार आहे. महापालिकेच्या अख्त्यारितील २४ विभागांची झाडाझडती घेण्यासाठी सोमवार ते शनिवार वेळपत्रक आखून दिले आहे. सोमवारी पर्यावरण अधिकारी महेश देशमुख हे जीएडीमधील उपस्थिती पाहतील तर शनिवारी ही जबाबदारी स्वप्निल जसवंते यांच्याकडे देण्यात आले आहे. सोमवार ते शनिवार असे सहा दिवस वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे २४ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन वेळेबाबत शिस्त निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये, सर्व शासकीय आणि नागरिकांची कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत, याबाबी विचारात घेऊन नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. (प्रतिनिधी)असा आहे आदेश नेमून दिलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रथम त्यांच्या कार्यालयामधील हजेरीपत्रात स्वाक्षरी करावी. सोबतच्या तक्त्यात नेमून दिल्याप्रमाणे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजता नेमून दिलेल्या विभागास भेट देऊन तपासणीच्या वेळी अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावासमोर हजेरी बुकवर लाल पेनाने खुण करावी व त्याखाली स्वाक्षरी करावीसकाळी १० वाजता भेट देऊन तपासणी केल्यानंतर त्याच कार्यालयात दिवसभरात कोणत्याही वेळी अचानक भेट देऊन तेथील हालचाल रजिस्टरची तपासणी करावी. जे कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असतील व त्यांनी नोंदवहीत नोंद घेतली नसेल तर अशा कर्मचाऱ्यांचे त्यादिवसाचे विनावेतन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. नियुक्त अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा त्या विभागातील कर्मचाऱ्यांची कार्यविवरण नोंदवही तपासावी.संबंधित कर्मचाऱ्याकडे किती संदर्भ प्राप्त झाले, त्यापैकी कितीचा निपटारा केला व किती संदर्भ प्रलंबित आहेत, याचा आढावा घ्यावा. कुठल्याही कार्यवाहीविना नस्ती अकारण प्रलंबित असल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी.