शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'राजगोंड'ला सर्वोच्च न्यायालयानेही धुडकावले, जातवैधता मिळण्यासाठी समितीकडे सादर केली खोटी वंशावळ

By गणेश वासनिक | Updated: October 22, 2023 16:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला फेटाळला.

अमरावती : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 'राजगोंड' बोगस ठरविल्याच्या निर्णयाविरुद्ध नेताजी माणिकराव चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत एसएलपी १८७४३/२०२३ दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन तर्क विचारात घेत याचिकेवर विचार करण्याचे कारण दिसत नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा खटला फेटाळला.

किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने नेताजी माणिकराव चौधरी व त्यांचा मुलगा पियूष, मुलगी प्राची यांचा अनुसूचित जमातीतील 'राजगोंड' जमातीचा दावा नाकारला होता. समितीच्या या आदेशाविरोधात नेताजी चौधरी यांनी रिट याचिका क्र.८८९४/२०२३ व प्राची चौधरी आणि पियुश चौधरी यांनी रिट याचिका क्र. ८९३२/२०२३ उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केल्यात. या याचिकांवर सुनावणी होऊन हे प्रकरण संविधानाची फसवणूक करणारे आहे. असे म्हणत उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी या तिघांच्याही याचिका फेटाळून लावल्या, हे विशेष. या खटल्याचा निर्णय न्यायमूर्ती ऋषिकेश राॅय व संजय करोल यांनी दिला आहे. याचिकाकर्त्याच्या बाजूने जेष्ठ विधिज्ञ अनिथा शेणाॅय यांनी युक्तिवाद केला.काय आहे प्रकरण ?नेताजी चौधरी यांनी स्वत: व त्यांच्या रक्तनात्यातील संबंधितांनी शालेय अभिलेखामध्ये 'राजगोंड' या अनुसूचित जमातीचा लाभ घेण्याच्या हेतूने नियमबाह्यरित्या खाडाखोड करुन जातीच्या रकान्यातील 'तेलंग' हा शब्द खोडून त्या ठिकाणी 'राजगोंड' शब्द लिहून बदल केला आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या हेतूने खोटी वंशावळ सुद्धा सादर केली होती.१४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये लाभ कसा?सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ च्या निर्णयात अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या परंतु नंतर ज्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरले, अशांच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरविल्या आहे. राज्य शासनाने घटनेतील तरतुदींशी विसंगत पाच शासन निर्णय २१ डिसेंबर २०१९ रोजी रद्द केले. नियुक्त्याच कायदेशीर नाही तर १४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये लाभ कसा? त्यामुळे शासनाने आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० जागांची विशेष पदभरती मोहीम चालू करावी, अशी मागणी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अखिल भारतीय गोंड आदिवासी संघाच्यावतीने स्वागत आहे. राज्याच्या ज्या भागात गोंड, राजगोंड जमातीत घुसखोरी झाली, त्याचा शोध शासनाने घ्यावा. संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कठेार कारवाई करावी.- डॉ. संदीप धुर्वे आमदार, तथा राज्याध्यक्ष अ.भा.गोंड आदिवासी संघ, महाराष्ट्र.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय