फूड पार्कची पायाभरणी करा
By Admin | Updated: September 9, 2016 00:38 IST2016-09-09T00:38:45+5:302016-09-09T00:38:45+5:30
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात शासनाने मंजूर केलेले पतंजली फूडपार्कची पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी

फूड पार्कची पायाभरणी करा
रवी राणांची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात शासनाने मंजूर केलेले पतंजली फूडपार्कची पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी आ. रवि राणा यांनी केली आहे. नागपूर येथे १० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुडपार्कचा शुभारंभ होत असून या पार्श्वभूमिवर ही मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात आ.रवि राणा यांनी रामदेव बाबा यांच्यता पतंजली फुड पार्कचा शुभारंभ नागपुरात होत आहे. याच दिवशी नांदगाव पेठ येथील फुड पार्कची पायाभरणी केल्यास जिल्ह्यात १५ हजार बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, ही बाब आ. राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. नांदगाव पेठ येथे फुड पार्क हे ३५० एकर साकाराले जाणार आहे. गत आठ महिन्यांपूर्वी पतंजली संस्थांचे विश्वस्त बालकृष्ण महाराज यांनी नांदगाव पेठ येथे भेट देवून प्रस्तावित फुड पार्क जागेची पाहणी केली होती.या जागेवर फुड पार्क निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मुंबई येथील एमआयडीसीसे मान्य केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुड पार्क निर्मितीला होकार दिला. नांदगाव पेठ येथे रेमण्ड गारमेंट प्रकल्पासाठी जमीन वाटप करताना जे निकष लागू केले तेच निकष पतंजली फुड पार्कसाठी लागू करावे, असे आ. राणा यांचे म्हणने आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, एमआयडीसीचे मुख्य सचिव अपूर्व चंद्रा आदींना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. नांदगाव पेठ येथील जागेचा प्रश्न दुय्यम असून मुख्यमंत्र्यांनी नांदगाव पेठ येथील फुड पार्कचे उद्घाटन शनिवारी करावे,अशी मागणी राणायांनी केली.