शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

अंजनगाव, दर्यापूरला अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शुक्रवारी सकाळी कहर केला.

ठळक मुद्देवडनेरगंगाई, भंडारज गावात पाणी शिरले : क पाशी, सोयाबीन नेस्तनाबूत; नदीनाल्यांना पूर, धरणाची दारे उघडली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी/धारणी/दर्यापूर : तिन्ही तालुक्यांना गुरुवारी रात्री परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला. अंजनगाव सुर्जीतील भंडारज गावात पुराचे पाणी शिरले, तर दर्यापूर तालुक्यातील येवदालगतच्या वडनेरगंगाई गावातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला मुसळधार पावसाने पृूर आला. अंजनगाव व सुर्जी या दोन गावांच्या मध्यभागातून वाहणाºया शहानूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चक्क हिवाळ्यात शुक्रवारी दुपारी हा मार्ग बंद होता.गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शुक्रवारी सकाळी कहर केला. सतत तीन तास आलेल्या पावसाने तालुक्यातील पाचही मंडळांत प्रचंड पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस भंडारज मंडळात कोसळला. भंडारज, कारला, तुरखेड, जवर्डी, धनवाडीसह पूर्ण मंडळातील कपाशीची हानी झाली.शुक्रवारी मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानासंदर्भात पंचनामे करण्याच्या तसेच जनावरांची जीवितहानी झाली असेल, तर आर्थिक मदत देण्याच्या सूचना अंजनगावच्या तहसीलदारांना दिल्या आहेत.- बळवंत वानखडेआमदार, दर्यापूरशहानूरची दारे उघडलीशहानूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे चारही दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले. शहानूर नदी दुथडी भरून वाहत आहे. अकोट ते अंजनगाव रस्त्यावर सातेगावजवळील निर्माणाधीन पुलाच्या बाजूचा रपटा वाहून गेल्याने सकाळपासूनच हा रस्ता रहदारीसाठी बंद होता.अकोट-अंजनगाव वाहतूक ठप्प; तीन गाई वाहून गेल्यावनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला, सातेगाव, गावंडगाव, निमखेड बाजार, हिरापूर, भंडारज, चिंचोली, वनोजा, हंतोडा, विहिगाव परिसरात शुक्रवारी सकाळी ६ वाजता अचानक झालेल्या अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. पुरात नाल्याकाठच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू, भांडीकुंडी वाहून गेली. कारला येथील मुरलीधर डोंगरकर यांच्या तीन गाई वाहून गेल्या. कौसल्याबाई रतन इंगळे यांचे पाच पोते सोयाबीन वाहून गेले. सातेगाव फाट्याजवळ पुरामुळे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने अकोट-अंजनगाव मार्ग दिवसभर बंद होता.मेळघाटात परतीच्या पावसाने ‘ओला दुष्काळ’धारणी : तालुक्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने धान पीक पूर्णत: झोपले. येथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता बुलंद होऊ लागली आहे. महसूल प्रशासनाकडून संयुक्त सर्र्वेेक्षणाचे आदेश देण्यात आले असले तरी तालुक्यातील १५० गावांचे सर्वेक्षण १२ तलाठी, २८ कृषिसेवकांच्या भरवशावर ८ नोव्हेंबरपर्यंत अवघड आहे. यामुळे विनाअट भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवानी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस