शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पावसाची दडी; मृग बहर अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:00 AM

संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.

ठळक मुद्देविम्याकडेही पाठ : कृषी अधिकाऱ्यांचा लक्षवेध, कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : लांबलेल्या पावसामुळे यंदा संत्र्याचा मृग बहर अडचणीत आला आहे. आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत.वरूड-मोर्शीच्या संत्र्याची चव आखाती देशांनी चाखली आहे. एकेकाळी वरूड तालुक्याला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणूनही ओळखले जात होते. वरूड तालुक्यात एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्रफळ संत्र्याच्या लागवडीखाली आहे. येथील बहुतांश शेतकरी मृग बहर घेण्यास इच्छुक असतात. संत्र्याचा मृग बहर हा १०० टक्के पावसाच्या भरवशावर अवलंबून असतो. त्यात यंदा मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा मेअखेरपर्यंत बागांचे सिंचन केले. परंतु, यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने अनपेक्षित सुरुवात केली. त्यामुळे मृग बहराचे गणित बिघडले.मृग बहरासाठी एक महिन्याचा ताण आवश्यक असतो. झाडांना पाहिजे तेवढा ताण बसला नाही. पहिल्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्यामुळे संत्रा झाडांनी मोठ्या प्रमाणावर नवती घेतली आहे. तालुक्यात अजूनही दमदार पाऊस बरसलेला नाही. आता फूट होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी आंतरपीक म्हणून तूर किंवा सोयाबीनकडे वळले आहेत. ‘लोकमत’ ने ३ जूनच्या अंकात भाकीत व्यक्त केले होते, ते तंतोतंत खरे ठरले.संत्र्याचा ऑनलाइन विम्याकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. ती मुदत २५ जून होती.संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जेथे झाडांची नवती निघाली नसेल किंवा झाड सुप्तावस्थेत असेल, तेथे संजीवक व १२:६१:०० फवारणीचे खत मिसळून तातडीने फवारणी करावी. दमदार पाऊस झाल्यास परिस्थिती बदलू शकते.- श्यामसुंदर ताथोडे, प्राचार्य, स्व.पंजाबराव ठाकरे कृषी विद्यालय, हातुर्णावरूड तालुक्यातील १९ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. पैकी ९ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावर मृग बहर घेतला जातो. मात्र पावसाच्या दीर्घ दडीने तो हातातून जाण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचे नुकसान संभवते.- उज्ज्वल आगरकरतालुका कृषी अधिकारी, वरूड.बºयाच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. शासनाने संत्रा पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी. संत्र्याला पीक विम्याचे कवच मिळाल्यास शासनाचा भार काही प्रमाणात हलका होईल.- सुधाकर दोडसंचालक, बाजार समिती वरुड

टॅग्स :Natureनिसर्ग