शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
3
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
4
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
5
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
6
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
7
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
8
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
9
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
10
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
11
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
12
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
13
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
14
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
15
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
16
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
17
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
18
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
19
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
20
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा हलक्या धानाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST

शनिवारच्या सायंकाळपासून रविवारी पहाटेच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आष्टी, घोट तसेच एटापल्ली तालुक्यात तसेच गडचिरोली शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. इतरही तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा अवकाळी पाऊस बरसला. एटापल्ली तालुक्यात शनिवारच्या रात्री जोरदार पाऊस बरसला.

ठळक मुद्देहलक्या धानाचे नुकसान : जड व मध्यम प्रतिच्या धानाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/एटापल्ली : पावसाळ्याचे दिवस संपलेले आहेत. मात्र वातावरणात अचानक बदल घडून १९ आॅक्टोबर रोजी शनिवारला तसेच रविवारला पहाटेच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे मध्यम व जड प्रतीच्या धानपिकाला फायदा झाला. मात्र अंतिम टप्प्यात व निसव्यावर असलेल्या हलक्या प्रतिच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.शनिवारच्या सायंकाळपासून रविवारी पहाटेच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आष्टी, घोट तसेच एटापल्ली तालुक्यात तसेच गडचिरोली शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. इतरही तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा अवकाळी पाऊस बरसला. एटापल्ली तालुक्यात शनिवारच्या रात्री जोरदार पाऊस बरसला. यामुळे हलक्या प्रतीच्या धानपिकाचे नुकसान झाले. या भागात काही शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीच्या धानपिकाची कापणी केली होती. कडपा बांधणीच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र अचानक पाऊस बरसल्याने धानाच्या कडपा भिजून नुकसान झाले.कोरडवाहू शेतजमिनीत कमी पाण्याची शेती करावी लागते. अशा शेतजमिनीत शेतकरी कमी मुदतीचे हलक्या प्रतीच्या धानपिकाची लागवड करतात. सदर धानपिकाची दिवाळी सणापूर्वी कापणी व बांधणी केली जाते. यावर्षी बºयाच शेतकºयांनी सुरूवातीच्या टप्प्यात हलक्या धानपिकाची रोवणी केली. त्यानंतर शेतजमिनीवर खत टाकून निंदन काढण्यात आले. काही भागातील हलक्या धानपिकावर लष्कर अळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात कीटकनाशकांची फवारणी केली. त्यामुळे हलके धानपीक पुन्हा जोमात आले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ऐन कापणीला आलेल्या धानपिकाचे पावसामुळे नुकसान झाले.अवकाळी पावसामुळे झालेल्या धानपीक नुकसानीबाबत प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांकडून होत आहे.१५ एकरमधील कापणी झालेले पीक भिजलेएटापल्ली तालुक्याच्या कुसनार येथील शेतकरी मन्नू सन्नू मडावी यांचे तीन एकरातील हलक्या धानपिकाची कापणी झाली होती. लच्चू दसरू हिचामी यांच्या चार एकर शेतातील, बंडू रमा टॅलैंड यांचे सात एकर तसेच जवेली, दुम्मे, पंदेवाही, कसनसूर आदी गावातील बºयाच शेतकºयांचे कापणी झालेल्या धानाच्या कडपा पावसाने भिजल्या. १५ एकरपेक्षा अधिक शेतीतील पिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती