शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:50 IST

यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत.

 अमरावती - यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने ८०७ गावे बाधित झालीत. यामध्ये ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ नागरिक बेघर झालेले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ६८,८३८ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 विभागात सद्यस्थितीत अकोला, वाशीम जिल्हा वगळता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात पावसाचीे सरासरी माघारली आहे. सरासरीच्या ८ टक्के पाऊस जास्त झाला. यामध्ये नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे व वीज पडल्याने ३० नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे ८०७ गावांत ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८०८ कुटुंबातील १३९, अकोला जिल्ह्यात ७६२ कुटुंबांतील ३,०४८ व यवतमाळ जिल्ह्यात २,२१६  कुटुंबांतील ४,७८५ व्यक्ती बाधित झाल्यात. या कालावधीत ३० नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ १२, बुलडाणा ४, व वाशिम जिल्ह्यात ६ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ११, अकोला ६,अमरावती ५,बुलडाणा १ व वाशीम जिल्ह्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ६८,४३८ हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेली, तर अकोला जिल्ह्यात ४,६०४, बुलडाणा १.१० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यातील २९ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मृताच्या वारसांना ९६ लाखांची मदतयामध्ये २४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ९६ लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ १०४ जनावरे मृत झाली. यापैकी १५ प्रकरणांत ४.३८ लाखांची मदत देण्यात आली. २०४ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी २८ प्रकरणात १.०५लाखांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी ९ जनावरे दगावलीत.  

आपत्तीमध्ये ९,९५८ घरांची पडझडया नैसर्गिक आपत्तीमध्ये २५१ घरांची पूर्ण, १४२६ घरांची अंशत:, ९१५८ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ४ लाखांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे १४ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने १० व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ६ व्यक्ती अशा ३० नागरिकांचा बळी गेला.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ