शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:50 IST

यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत.

 अमरावती - यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने ८०७ गावे बाधित झालीत. यामध्ये ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ नागरिक बेघर झालेले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ६८,८३८ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 विभागात सद्यस्थितीत अकोला, वाशीम जिल्हा वगळता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात पावसाचीे सरासरी माघारली आहे. सरासरीच्या ८ टक्के पाऊस जास्त झाला. यामध्ये नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे व वीज पडल्याने ३० नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे ८०७ गावांत ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८०८ कुटुंबातील १३९, अकोला जिल्ह्यात ७६२ कुटुंबांतील ३,०४८ व यवतमाळ जिल्ह्यात २,२१६  कुटुंबांतील ४,७८५ व्यक्ती बाधित झाल्यात. या कालावधीत ३० नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ १२, बुलडाणा ४, व वाशिम जिल्ह्यात ६ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ११, अकोला ६,अमरावती ५,बुलडाणा १ व वाशीम जिल्ह्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ६८,४३८ हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेली, तर अकोला जिल्ह्यात ४,६०४, बुलडाणा १.१० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यातील २९ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मृताच्या वारसांना ९६ लाखांची मदतयामध्ये २४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ९६ लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ १०४ जनावरे मृत झाली. यापैकी १५ प्रकरणांत ४.३८ लाखांची मदत देण्यात आली. २०४ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी २८ प्रकरणात १.०५लाखांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी ९ जनावरे दगावलीत.  

आपत्तीमध्ये ९,९५८ घरांची पडझडया नैसर्गिक आपत्तीमध्ये २५१ घरांची पूर्ण, १४२६ घरांची अंशत:, ९१५८ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ४ लाखांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे १४ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने १० व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ६ व्यक्ती अशा ३० नागरिकांचा बळी गेला.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ