शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:50 IST

यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत.

 अमरावती - यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने ८०७ गावे बाधित झालीत. यामध्ये ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ नागरिक बेघर झालेले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ६८,८३८ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 विभागात सद्यस्थितीत अकोला, वाशीम जिल्हा वगळता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात पावसाचीे सरासरी माघारली आहे. सरासरीच्या ८ टक्के पाऊस जास्त झाला. यामध्ये नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे व वीज पडल्याने ३० नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे ८०७ गावांत ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८०८ कुटुंबातील १३९, अकोला जिल्ह्यात ७६२ कुटुंबांतील ३,०४८ व यवतमाळ जिल्ह्यात २,२१६  कुटुंबांतील ४,७८५ व्यक्ती बाधित झाल्यात. या कालावधीत ३० नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ १२, बुलडाणा ४, व वाशिम जिल्ह्यात ६ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ११, अकोला ६,अमरावती ५,बुलडाणा १ व वाशीम जिल्ह्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ६८,४३८ हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेली, तर अकोला जिल्ह्यात ४,६०४, बुलडाणा १.१० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यातील २९ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मृताच्या वारसांना ९६ लाखांची मदतयामध्ये २४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ९६ लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ १०४ जनावरे मृत झाली. यापैकी १५ प्रकरणांत ४.३८ लाखांची मदत देण्यात आली. २०४ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी २८ प्रकरणात १.०५लाखांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी ९ जनावरे दगावलीत.  

आपत्तीमध्ये ९,९५८ घरांची पडझडया नैसर्गिक आपत्तीमध्ये २५१ घरांची पूर्ण, १४२६ घरांची अंशत:, ९१५८ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ४ लाखांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे १४ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने १० व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ६ व्यक्ती अशा ३० नागरिकांचा बळी गेला.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ