शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘डीबीटी’वर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:54 IST

विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेबाबत भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे ‘ट्रायबल’ आयुक्तांनी याबाबत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अपर आयुक्त अंर्तगत एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी मागविला अभिप्रायठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती एटीसींना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये प्रवेशित इयत्ता पहिली ते बारावी, पदवी, पदव्युत्तर व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेबाबत भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यामुळे ‘ट्रायबल’ आयुक्तांनी याबाबत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अपर आयुक्त अंर्तगत एकात्मिक प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागविले आहे. परिणामी येत्या काळात ‘डीबीटी’ सुरू असेल अथवा नाही, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.राज्य शासनाने १२ मे २०१७ च्या निर्णयानुसार वसतिगृह, आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’ लागू केली तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. मात्र, आदिवासी विद्यार्थ्यांना योजनेतून थेट पैसे देण्यात येत असल्याने आदिवासी नेत्यांचा ‘डीबीटी’ला कडाडून विरोध होत आहे.

अतिदुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती शालेय जीवनातच पैसा येत असल्याने ते वाममार्गाकडे वळतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे योजनांमध्ये होणारे अपहार, दलालराज, कमिशनचा सुळसुळाट रोखण्यासाठी ‘डीबीटी’ हा स्तुत्य उपक्रम आहे. थेट आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम बँक खात्यात जमा होऊन गरजेनुसार खर्च करता येईल, असा दुसरा मतप्रवाह पुढे आला आहे. त्यामुळे आदिवासी विकास आयुक्तांनी ‘डीबीटी’बाबत अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांच्याकडून अभिप्राय मागविला आहे. त्यानंतर राज्य शासन याविषयी ठोस भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.अशी मिळते साहित्य खरेदीसाठी ‘डीबीटी’ची रक्कमशासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ७ हजार ५०० रुपये, इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत ८ हजार ५००, इयत्ता नववी ते बारावीपर्यंत ९,५०० रुपये वार्षिक रक्कम दिली जाते. या रकमेतून विद्यार्थ्यांना साबण, खोबरेल तेल, टूथपेस्ट, ब्रश, कंगवा, नेलकटर, शालेय साहित्य, गणवेश, छत्री, पायमोजे, बूट, टॉवेल, स्वेटर, सतरंजी, चादर, बेडशीट, उशी आदी साहित्य खरेदी करता येते तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना जेवण, निवास, शालेय साहित्य खर्चासाठी दरवर्षी ५१०० रुपये डीबीटी रक्कम दिली जाते.महापालिका, नगरपालिका स्तराहून ‘डीबीटी’संदर्भात अभिप्राय मागविला आहे. याबाबत निर्णय व्हायचा असून, या योजनेत काही सुधारणा करायच्या आहेत. अपर आयुक्तांकडून येणाºया अभिप्रायानंतरच शासन निर्णय घेणार आहे.- किरण कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिकआदिवासींना १ मेपासून अजूनही खावटी देऊ शकले नाही. शासनाचा बोगस कारभार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ‘डीबीटी’बाबत शासनाने अगोदर शुद्धीपत्रक अथवा निर्णय जारी करावा. आदिवासींची दिशाभूल करू नये.- अशोक उईके,माजी मंत्री, आदिवासी विकास

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र