हरणाचे पाडस वडाळीत ‘क्वारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:20+5:30

वनविभागाच्या माहितीनुसार, दर्यापूर वनबीट अंतर्गत हरणाचे पाडस कळपापासून वेगळे पडून भरटकल्याचे वनकर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. ते एकटेच असल्याने त्याच्या संरक्षणचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे संंबंधित वनकर्मचाºयाने वरिष्ठांसोबत संपर्क साधला. त्यानंतर हे पाडस परतवाडा येथील वनविभागाच्या पशू दवाखान्यात आणले गेले.

'Quarantine' in Deer Padas Palace | हरणाचे पाडस वडाळीत ‘क्वारंटाईन’

हरणाचे पाडस वडाळीत ‘क्वारंटाईन’

ठळक मुद्देदर्यापुरात कळपातून भरटकले : परतवाडा वनविभागाने संरक्षणार्थ पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापूर वनबीटमधील हरणाचे पाडस कळपातून भरटकले होते. त्याचे संरक्षण आणि देखभाल व्हावी, यासाठी परतवाडा वनविभागाने वडाळी येथे पशुसंवर्धन कक्षात रविवारी त्याला आणून सोडले.
वनविभागाच्या माहितीनुसार, दर्यापूर वनबीट अंतर्गत हरणाचे पाडस कळपापासून वेगळे पडून भरटकल्याचे वनकर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. ते एकटेच असल्याने त्याच्या संरक्षणचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे संंबंधित वनकर्मचाऱ्याने वरिष्ठांसोबत संपर्क साधला. त्यानंतर हे पाडस परतवाडा येथील वनविभागाच्या पशू दवाखान्यात आणले गेले. मात्र, ते जखमी अथवा कोणतीही इजा झालेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाडसाचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे, शिवाय ते आईपासून विलग झाल्याने त्याच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न उभा ठाकला.
अखेर परतवाडा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी या पाडसाला वडाळी येथील पशुसंवर्धन कक्षात पाठविण्याचा नर्णय घेतला. त्यानुसार हे पाडस वडाळीत रविवारी उशिरा सायंकाळी आणण्यात आले. वडाळी येथे या पाडसाची निगा आणि संरक्षण घेतले जात आहे. त्याचा दिमतीला वनमजूर ठेवण्यात आले आहेत. या पशुसंवर्धन कक्षात काही दिवसांपूर्वी बिबटांचे वास्तव्य होते.

हरणाचे पाडस अंदाजे दीड ते दोन महिन्याचे आहे. त्याला दूध अथवा फळे देण्यात येतील. एकदा ते मोठे झाले की, पुन्हा कळपात सोडले जाईल. किमान पाच महिने त्याला देखभालीत ठेवले जाईल.
- कैलास भुंबर
वनपरिक्षेत्राधिकारी, वडाळी

Web Title: 'Quarantine' in Deer Padas Palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.