शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

शासकीय यंत्रणांनी आगीबाबत समाजात जनजागृती करावी!

By admin | Updated: April 24, 2017 00:45 IST

वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे.

पालकमंत्र्यांचे निर्देश : बचावात्मक उपाययोजना कराअमरावती : वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे. यासंदर्भात आगीपासून नागरिकांचा बचाव करण्याकरिता व होणाऱ्या जीवित व वित्तहानी रोखण्याकरिता दक्षता घेण्याबाबत उद्योग खनिकर्म पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आवाहन केले आहे.पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद यांना आगीपासून बचाव करण्याकरिता शहरस्तरावर व ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे सहकार्य घेऊन जनजागृती करण्याबाबत निर्देश दिले. तसेच राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग शहरातील रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. अशा दोषींविरुद्ध कडक कार्यवाही करावी. घराभोवती, झाडाच्या पाराभोवती किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेला केरकचरा जाळू नये. संबंधित नागरिक असे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर पोलीस कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.वाढत्या उष्णतामानामुळे आगीपासून बचावासाठी पुढीलप्रमाणे सूचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी आगीपासून बचावासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे ना. पोटे यांनी निर्देश दिलेत. काय करावे व काय करु नये !घरोसमोरील परिसरातील किंवा गुरांच्या गोठ्याभोवती असलेला केरकचरा जाळू नये. घराच्या भोवताल किंवा गुरांच्या गोठ्याभोवती कचरा किंवा जळावू वस्तू जसे कडबा व कुटार ठेवू नये. स्वत:च्या कपड्यांना आग लागल्यास जमिनीवर लोळून विझविण्याचा प्रयत्न करावा. शेतातील धुरांवर जाळ करताना खबरदारी घ्यावी. फटाके फोडताना सार्वजनिक ठिकाणी फोडणे धोक्याचे आहे. ज्या ठिकाणी जळावू साहित्य आहे त्या ठिकाणी किंवा शेतामध्ये इतर ठिकाणी शक्यतोवर फाटके फोडू नये. घरातील जुनी विजेची तारे व उपकरणे शक्यतो बदलवून टाकावित. आपल्या घरामध्ये कामाच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग जाणून व नेहमी अडथळे विरहीत ठेवावे. घरातील कोठीवर पडकी जागा इत्यादी ठिकाणी कचरा तेलकट अथवा जळावू पदार्थ जमा करु नये. घरातील हिटर, गॅस इत्यादीपासून कपडे, पडदे व लाकडी वस्तु कमीत कमी तीन फूट लांब ठेवाव्यात. काडीपेट्या, केरोसीन, अत्तर, इस्त्री या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात. स्वयंपाकघरातील सिलिंडरचा रेग्युलेटर बंद ठेवावा. चुलीतील विस्तव पूर्ण विझल्याबाबत खात्री करून घ्यावी. झोपताना दिवा लांब ठेवावा किंवा बंद ठेवावा. ज्वालाग्राही वस्तू असल्यास शक्यतो दूर ठेवाव्यात. आग लागल्यास लगेच अग्निशमन दलाला टोल फ्री क्र. १०१ व कार्यालय दूरध्वनी क्र. ०७२१-२५७६४२६ व सर्व नगरपरिषद येथील दूरध्वनी क्रमांकावर तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.