शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

शासकीय यंत्रणांनी आगीबाबत समाजात जनजागृती करावी!

By admin | Updated: April 24, 2017 00:45 IST

वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे.

पालकमंत्र्यांचे निर्देश : बचावात्मक उपाययोजना कराअमरावती : वाढत्या उष्णतामानामुळे काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहे. यासंदर्भात आगीपासून नागरिकांचा बचाव करण्याकरिता व होणाऱ्या जीवित व वित्तहानी रोखण्याकरिता दक्षता घेण्याबाबत उद्योग खनिकर्म पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आवाहन केले आहे.पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद यांना आगीपासून बचाव करण्याकरिता शहरस्तरावर व ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे सहकार्य घेऊन जनजागृती करण्याबाबत निर्देश दिले. तसेच राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग शहरातील रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. अशा दोषींविरुद्ध कडक कार्यवाही करावी. घराभोवती, झाडाच्या पाराभोवती किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेला केरकचरा जाळू नये. संबंधित नागरिक असे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर पोलीस कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.वाढत्या उष्णतामानामुळे आगीपासून बचावासाठी पुढीलप्रमाणे सूचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस यंत्रणा, सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी आगीपासून बचावासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे ना. पोटे यांनी निर्देश दिलेत. काय करावे व काय करु नये !घरोसमोरील परिसरातील किंवा गुरांच्या गोठ्याभोवती असलेला केरकचरा जाळू नये. घराच्या भोवताल किंवा गुरांच्या गोठ्याभोवती कचरा किंवा जळावू वस्तू जसे कडबा व कुटार ठेवू नये. स्वत:च्या कपड्यांना आग लागल्यास जमिनीवर लोळून विझविण्याचा प्रयत्न करावा. शेतातील धुरांवर जाळ करताना खबरदारी घ्यावी. फटाके फोडताना सार्वजनिक ठिकाणी फोडणे धोक्याचे आहे. ज्या ठिकाणी जळावू साहित्य आहे त्या ठिकाणी किंवा शेतामध्ये इतर ठिकाणी शक्यतोवर फाटके फोडू नये. घरातील जुनी विजेची तारे व उपकरणे शक्यतो बदलवून टाकावित. आपल्या घरामध्ये कामाच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग जाणून व नेहमी अडथळे विरहीत ठेवावे. घरातील कोठीवर पडकी जागा इत्यादी ठिकाणी कचरा तेलकट अथवा जळावू पदार्थ जमा करु नये. घरातील हिटर, गॅस इत्यादीपासून कपडे, पडदे व लाकडी वस्तु कमीत कमी तीन फूट लांब ठेवाव्यात. काडीपेट्या, केरोसीन, अत्तर, इस्त्री या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवाव्यात. स्वयंपाकघरातील सिलिंडरचा रेग्युलेटर बंद ठेवावा. चुलीतील विस्तव पूर्ण विझल्याबाबत खात्री करून घ्यावी. झोपताना दिवा लांब ठेवावा किंवा बंद ठेवावा. ज्वालाग्राही वस्तू असल्यास शक्यतो दूर ठेवाव्यात. आग लागल्यास लगेच अग्निशमन दलाला टोल फ्री क्र. १०१ व कार्यालय दूरध्वनी क्र. ०७२१-२५७६४२६ व सर्व नगरपरिषद येथील दूरध्वनी क्रमांकावर तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.