तपोवन, साईनगर पोलीस ठाणे निर्मितीची प्रस्ताव
By Admin | Updated: March 8, 2015 00:11 IST2015-03-08T00:11:49+5:302015-03-08T00:11:49+5:30
शहराचा वाढता विस्तार बघता तपोवन, साईनगर भागाचे स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष तुषार

तपोवन, साईनगर पोलीस ठाणे निर्मितीची प्रस्ताव
अमरावती : शहराचा वाढता विस्तार बघता तपोवन, साईनगर भागाचे स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. यापुर्वी साईनगर परिसरात पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे, हे येथे उल्लेखनीय.
मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात भारतीय यांनी पोलीस आयुक्तालयात हल्ली १० पोलीस ठाणे आहेत. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार लक्षात घेता नवीन दोन पोलीस ठाणे निर्माण करणे गरजेचे झाले आहे. साडेआठ ते नऊ लाख लोकसंख्या महानगराची असून काही ग्रामीण भागही पोलीस ठाण्यांना जोडण्यात आला आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना त्या तुनलेत पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे तुषार भारतीय यांनी म्हटले आहे.
संरक्षणासाठी आवश्यक
अमरावती : शहराची सीमा बघता पूर्व आणि पश्चिम परिसरात नव्याने वसाहती स्थापन होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तपोवन, साईनगर या भागात नव्याने पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे स्वरुप वाढत असून दिवसाढवळ्या गोळीबार, मंगळसूत्र चोरीच्या घटना, वाहन चोरणारी टोळी, महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. मणुष्यबळाची कमतरता ही नित्याचीच बाब असल्याने पोलिसांवर कामाचा ताण वाढत चालला आहे. एखाद्या घटनेचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया राबविताना मणुष्यबयाच्या कमतरतेने पोलीसांची दमझाक होत आहे. नव्याने पोलीस ठाणे मंजूर झाल्यास त्यानुसार मणुष्यबळ देखील मंजूर केले जाईल,असे भारतीय यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. गुन्हेगारीचे वाढते स्वरुप लक्षात घेता नवीन ठाण्यांसह पोलीस मनुष्यबळ वाढविणे गरजेचे झाले आहे. साईनगर आणि तपोवन हे पोलीस ठाणे मंजूर झाले तर फ्रेजरपुरा, बडनेरा, राजापेठ या ठाण्यांवर येणारा कामांचा ताण कमी होईल. एखाद्या प्रकरणाचा तपास करताना अलिकडे मणुष्यबळ अभावी पोलिसांना अनेक संकटाच्या सामोरे जावे लागत आहे. शहराच्या नवीन भागात झपाट्याने लोकवस्त्या वाढत असल्यामुळे नागरिकांचे संरक्षण आणि कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी साईनगर, तपोवन या परिसराचे नवीन पोलीस ठाणे निर्माण करावे, अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.