शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

झेडपीत १४० कर्मचाऱ्यांच्या विभाग, टेबल बदलाचा प्रस्ताव; ठाण मांडून असलेल्याची होणार उचलबांगडी

By जितेंद्र दखने | Updated: July 7, 2023 17:31 IST

सीईओंच्या कोर्टात चेंडू

अमरावती :जिल्हा परिषदेतील विविध विभागात एकाच ठिकाणी सलग पाच वर्ष सेवापूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याचा विभाग तर एकाच टेबलवर तीन वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा टेबल बदलीसाठी सामान्य प्रशासन विभागाने १४० कर्मचाऱ्यांच्या खांदेपालट करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे सादर केला आहे. यावर सीईओंनी शिक्कामोर्तब करताच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी ठाणमांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून विविध विभागात सलग पाच वर्षापासून एकाच विभागात असलेले तसेच तीन वर्षापासून एकच टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती विभाग प्रमुखामार्फत मागविण्यात आली होती. यानुसार विविध विभागाच्या प्रमुखांनी १४० कर्मचाऱ्यांची यादी जीएडीकडे सादर केली होती. प्राप्त यादीनुसार टेबल बदलीकरिता १०० व विभाग बदलासाठी ४० कर्मचारी पात्र असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाने ३० जून रोजी तयार केला आहे. त्यानुसार अंतिम कारवाईसाठीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.

मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरी मिळताच एकाच विभागात पाच वर्षापासून ठाण मांडून असलेल्या विभाग तर सलग तीन वर्ष एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलविले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १४ विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी यांच्या मान्यतेची प्रतिक्षा लागली आहे.विशेष म्हणजे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार असल्यामुळे कामाची व्यस्तता आहे. त्यामुळे विभाग व टेबल बदलाच्या प्रस्तावावर सीईओकडून केव्हा शिक्कामोर्तब होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारीAmravatiअमरावती