शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

३.१३ लाख शेतकऱ्यांना १८८ कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:06 IST

दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यात १८७ कोटी ५१ लाख ६८ हजारांची रक्कम जमा होणार आहे.

ठळक मुद्देबजेटमध्ये तरतूद : पाच एकराखालील शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी सहा हजार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यात १८७ कोटी ५१ लाख ६८ हजारांची रक्कम जमा होणार आहे.शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पाच एकरापर्यंत शेती असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाण्याची घोषणा केली. ही मदत तीन टप्प्यात दिली जाणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली असली तरी सर्व स्तरांतून याबाबत प्रतिक्रीया आलेल्या आहेत.यंदा अपुºया पावसाने खरीप उद्ध्वस्त झाला अन् जमिनीतील आर्द्रतेअभावी रबी हंगामदेखील हातचा गेला. जिल्ह्यात ५० टक्क्यांवर रबीचे क्षेत्र नापेर असताना शासनाकडून दोन हजारांची मदत निश्चितच तुटपुंजी आहे. शेतीचा उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना शासनाद्वारा देण्यात येणारी मदत अल्पशी असल्याचे मत शेतकºयांनीही व्यक्त केले.शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्र शासनाने यापूर्वीच केली आहे. त्या अनुषंगाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्याच्या दृष्टीने या बजेटमध्ये काही असेल, हा मात्र भ्रम ठरला. काही ठोस उपाययोजनांबाबत अंदाजही फोल ठरला. चार वर्षांपासून दुष्काळ, नापिकी शेतकºयांच्या मागे हात धुवून लागली आहे. बाजारात हमीपेक्षाही किमान हजार रुपये कमीने शेतमाल विकावा लागत. आता शासनाद्वारे महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ५२८ अल्पभूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी सहा हजार म्हणजेच १८७.५१ कोटी जमा केले जातील. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या महिन्यात पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा होणार काय, याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे.पाच एकराखालील तालुकानिहाय शेतकरीजिल्ह्यात पाच एकराखालील शेती धारण करणारे ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी आहेत. अमरावती तालुक्यात २४ हजार ४८१, भातकुली २१ हजार २४५, नांदगाव खंडेश्वर ३० हजार ३२२, चांदूर रेल्वे १६ हजार ४४८, धामणगाव १८ हजार ७७९, तिवसा ३ हजार ४४७, मोर्शी ३२ हजार ३५२, वरूड ३१ हजार ९९, अचलपूर ३२ हजार ४५८, चांदूरबाजार ३७ हजार ६२५, दर्यापूर १९ हजार ६६२, अंजनगाव सुर्जी २५ हजार ९४५,धारणी १२ हजार १६६, चिखलदरा तालुक्यात ६ हजार ४८१ शेतकºयांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.१.७४ लाख शेतकरी वाºयावरजिल्ह्यातील पाच एकरावर शेती असणारे १ लाख ७४ हजार ७८८ शेतकºयांचा मात्र या अर्थसंकल्पात भ्रमनिरास झाला आहे. वरूड तालुक्यात ३१ हजार ४२४, चांदूर बाजार २१ हजार ९५२, दर्यापूर १९ हजार ६३५, तिवसा १९ हजार ७४, भातकुली १२ हजार ५४६, धामणगाव रेल्वे १० हजार १३६, अमरावती ९ हजार ५८३, नांदगाव खंडेश्वर ९ हजार २४५, मोर्शी ७ हजार ६४५, धारणी ७ हजार ५६५ अंजनगाव सुर्जी ७ हजार २९८, चांदूर रेल्वे ६ हजार ७४३, अचलपूर ६ हजार २६१ व चिखलदरा तालुक्यात ५ हजार ६८१ शेतकºयांना वाºयावर सोडल्याचा आरोप होत आहे.अशी मिळणार तालुकानिहाय मदतपाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकºयांना १८७.५१ कोटी दरवर्षी मिळतील. सर्वात कमी २.०४ कोटी रुपये तिवसा, तर सर्वाधिक ९९.४७ कोटी अचलपूर तालुक्यातील शेतकºयांना मिळतील. अमरावती १४.६८ कोटी, भातकुली १२.७४ कोटी, नांदगाव खंडेश्वर १८.१९ कोटी, चांदूर रेल्वे ९.८६ कोटी, धामणगाव रेल्वे ११.२६ कोटी, मोर्शी १९.४१ कोटी, वरूड १८.६५ कोटी, चांदूर बाजार २२.५७ कोटी, दर्यापूर ११.२० कोटी, अंजनगाव सुर्जी १५.५६ कोटी, धारणी ७.२९ कोटी व चिखलदरा तालुक्यात ३.८९ कोटी मिळणार आहेत.