शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

३.१३ लाख शेतकऱ्यांना १८८ कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:06 IST

दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यात १८७ कोटी ५१ लाख ६८ हजारांची रक्कम जमा होणार आहे.

ठळक मुद्देबजेटमध्ये तरतूद : पाच एकराखालील शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी सहा हजार

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यात १८७ कोटी ५१ लाख ६८ हजारांची रक्कम जमा होणार आहे.शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पाच एकरापर्यंत शेती असणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाण्याची घोषणा केली. ही मदत तीन टप्प्यात दिली जाणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली असली तरी सर्व स्तरांतून याबाबत प्रतिक्रीया आलेल्या आहेत.यंदा अपुºया पावसाने खरीप उद्ध्वस्त झाला अन् जमिनीतील आर्द्रतेअभावी रबी हंगामदेखील हातचा गेला. जिल्ह्यात ५० टक्क्यांवर रबीचे क्षेत्र नापेर असताना शासनाकडून दोन हजारांची मदत निश्चितच तुटपुंजी आहे. शेतीचा उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणात वाढला असताना शासनाद्वारा देण्यात येणारी मदत अल्पशी असल्याचे मत शेतकºयांनीही व्यक्त केले.शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केंद्र शासनाने यापूर्वीच केली आहे. त्या अनुषंगाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करण्याच्या दृष्टीने या बजेटमध्ये काही असेल, हा मात्र भ्रम ठरला. काही ठोस उपाययोजनांबाबत अंदाजही फोल ठरला. चार वर्षांपासून दुष्काळ, नापिकी शेतकºयांच्या मागे हात धुवून लागली आहे. बाजारात हमीपेक्षाही किमान हजार रुपये कमीने शेतमाल विकावा लागत. आता शासनाद्वारे महिन्याला पाचशे रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ५२८ अल्पभूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी सहा हजार म्हणजेच १८७.५१ कोटी जमा केले जातील. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या महिन्यात पहिला हप्ता शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा होणार काय, याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे.पाच एकराखालील तालुकानिहाय शेतकरीजिल्ह्यात पाच एकराखालील शेती धारण करणारे ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी आहेत. अमरावती तालुक्यात २४ हजार ४८१, भातकुली २१ हजार २४५, नांदगाव खंडेश्वर ३० हजार ३२२, चांदूर रेल्वे १६ हजार ४४८, धामणगाव १८ हजार ७७९, तिवसा ३ हजार ४४७, मोर्शी ३२ हजार ३५२, वरूड ३१ हजार ९९, अचलपूर ३२ हजार ४५८, चांदूरबाजार ३७ हजार ६२५, दर्यापूर १९ हजार ६६२, अंजनगाव सुर्जी २५ हजार ९४५,धारणी १२ हजार १६६, चिखलदरा तालुक्यात ६ हजार ४८१ शेतकºयांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.१.७४ लाख शेतकरी वाºयावरजिल्ह्यातील पाच एकरावर शेती असणारे १ लाख ७४ हजार ७८८ शेतकºयांचा मात्र या अर्थसंकल्पात भ्रमनिरास झाला आहे. वरूड तालुक्यात ३१ हजार ४२४, चांदूर बाजार २१ हजार ९५२, दर्यापूर १९ हजार ६३५, तिवसा १९ हजार ७४, भातकुली १२ हजार ५४६, धामणगाव रेल्वे १० हजार १३६, अमरावती ९ हजार ५८३, नांदगाव खंडेश्वर ९ हजार २४५, मोर्शी ७ हजार ६४५, धारणी ७ हजार ५६५ अंजनगाव सुर्जी ७ हजार २९८, चांदूर रेल्वे ६ हजार ७४३, अचलपूर ६ हजार २६१ व चिखलदरा तालुक्यात ५ हजार ६८१ शेतकºयांना वाºयावर सोडल्याचा आरोप होत आहे.अशी मिळणार तालुकानिहाय मदतपाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकºयांना १८७.५१ कोटी दरवर्षी मिळतील. सर्वात कमी २.०४ कोटी रुपये तिवसा, तर सर्वाधिक ९९.४७ कोटी अचलपूर तालुक्यातील शेतकºयांना मिळतील. अमरावती १४.६८ कोटी, भातकुली १२.७४ कोटी, नांदगाव खंडेश्वर १८.१९ कोटी, चांदूर रेल्वे ९.८६ कोटी, धामणगाव रेल्वे ११.२६ कोटी, मोर्शी १९.४१ कोटी, वरूड १८.६५ कोटी, चांदूर बाजार २२.५७ कोटी, दर्यापूर ११.२० कोटी, अंजनगाव सुर्जी १५.५६ कोटी, धारणी ७.२९ कोटी व चिखलदरा तालुक्यात ३.८९ कोटी मिळणार आहेत.