शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महिला, बाल कल्याणास प्राथमिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 9:55 PM

अन्य प्रशासकीय कामकाजाच्या तुलनेत महिला व बालकांचा विकास साधण्यास प्राधान्य देऊ, त्याच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी पूर्णत: करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही मनीषा खत्री यांनी दिली.

ठळक मुद्देमनीषा खत्री : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू

आॅनलाईन लोकमतअमरावती : अन्य प्रशासकीय कामकाजाच्या तुलनेत महिला व बालकांचा विकास साधण्यास प्राधान्य देऊ, त्याच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी पूर्णत: करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही मनीषा खत्री यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी शुक्रवारी खत्री रुजू झाल्या. यावेळी त्या बोलत होत्या.मूळ हरियाणातील सोनपत जिल्ह्यातील मनीषा खत्री या २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. बॅचमध्ये ३५ वा रँक असलेल्या खत्री यांनी यापूर्वी कोल्हापूर व दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयात सहसचिव म्हणून काम केले आहे. त्या पाचोरा (जळगाव) येथे एसडीओ होत्या.पदभार स्वीकारताना खत्री म्हणाल्या, मानवविकास निर्देशांक ज्या ठिकाणी आहे, त्यालाही प्राधान्य दिले जाईल. कुपोषणमुक्तीसाठी झेडपीच्या माध्यमातून अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाईल. प्रशासनाची धुरा सांभाळत प्रशासनच काम करेल. मेळघाटातील परंपरा व तेथील विषय वेगवेगळे आहेत. ते सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय साधून काम करणार असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. यावेळी डेप्युटी सीईओ कैलास घोडके, प्रकल्प संचालक के.एम. अहमद, अ‍ॅडिशन सीईओ विनय ठमके, माया वानखडे, कॅफो रवींद्र येवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे, प्रमोद तलवारे व अन्य खातेप्रमुख उपस्थित होते.कर्मचाºयांच्या प्रश्नांसाठी वैयक्तिक आढावाजिल्हा परिषदेतील कर्मचाºयांच्या पदोन्नती, बढतीबाबतचे प्रश्नही मार्गी लावले जातील व इतर प्रलंबित विषयाचा वैयक्तिक आढावा घेऊन प्रश्न सोडविणार असल्याचे मनीषा खत्री यांनी ‘लोकमत’ला सांगितले.