शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयाच्या प्राचार्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:01 IST

लॉकडाऊनच्या काळात अनुराग हा १५ दिवसांपूर्वी पळसखेड आला होता. संबंधित मुलीचे आईवडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत आहे, असे सांगत असल्याचे अनुरागने त्याच्या वडिलांना सांगितले. २ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक अनुरागची तब्येत अचानक बिघडली. त्याला पळसखेड येथून अमरावती येथे आणत असल्याची माहिती अनिल जगनाडे यांना फोनद्वारे मिळाली.

ठळक मुद्देअभियांत्रिकी विद्यार्थ्याची आत्महत्या, प्रवृत्त केल्याची तक्रार, आरोपींमध्ये मुलीचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील पळसखेड येथील अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी अनुराग अनिल जगनाडे (१९) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत कारमोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी मृताचे वडील अनिल जगनाडे यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजता जयंत कारमोरे, साहिल राज ठाकरे व एका मुलीविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.अनुरागने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पळसखेड येथे घडली होती. दोन वर्षांपूर्वी अनुरागचे एका मुलीशी प्रेमसंबध जुळले. या प्रकरणात प्राचार्य कारमोरे व अन्य दोघांनी आपल्या मुलाची मानसिक छळवणूक केली. संबंधित मुलगीदेखील अनुरागवर दबाव टाकायची. त्या छळाला कंटाळून अनुरागने आत्महत्या केली, असे अनिल जगनाडे यांनी नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीनुसार, पळसखेड येथील मूळ रहिवासी अनिल जगनाडे हे मुलांच्या शिक्षणासाठी अमरावती येथे राहतात. त्यांचा मुलगा अनुराग हा प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गाला होता. सन २०१८ मध्ये अनुराग बारावीमध्ये अमरावती येथे शिकत असताना, एका शिकवणी वर्गात त्याची एका मुलीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले. याबाबत माहिती होताच जयंत कारमोरे अनुरागच्या अमरावती येथील घरी दोन तीन वेळा मद्यपान करून आले व त्यांनी अनुरागसह त्यांच्या कुटुंबीयांना दमदाटी केली तसेच अनुरागला जिवे मारण्याची धमकी दिली. कारमोरे यांच्यामुळे दडपणाखाली येऊन अनुराग दोन दोन दिवस घरी येत नव्हता.यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जयंत कारमोरे संबंधित मुलीसह पोलिसांना घेऊन अनुरागच्या घरी आले. याप्रसंगी पोलिसांनी दोघांकडून एकमेकांना पुन्हा भेटणार नाही, असे लिहून घेतले. मात्र, त्यानंतरही त्या मुलीचे कॉल, मेसेज येत आपल्या मुलाला येत राहिले, असे अनिल जगनाडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अनुराग हा १५ दिवसांपूर्वी पळसखेड आला होता. संबंधित मुलीचे आईवडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत आहे, असे सांगत असल्याचे अनुरागने त्याच्या वडिलांना सांगितले. २ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक अनुरागची तब्येत अचानक बिघडली. त्याला पळसखेड येथून अमरावती येथे आणत असल्याची माहिती अनिल जगनाडे यांना फोनद्वारे मिळाली. ते जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचले. त्यावेळी रक्तवाहिनीमधून विषारी औषध घेतल्याने अनुरागचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. घटनेच्या वेळी अनिल जगनाडे हे अमरावतीत होते. त्यांच्या शेजाऱ्यांनी अनुरागला अत्यवस्थ स्थितीत इर्विनमध्ये आणले होते, तर गावातील एका इसमाने जगानाडे यांना याबाबत माहिती दिली होती.घरात सापडली सुसाईड नोटपळसखेड येथील राहत्या घरी अनुरागने इंग्रजीमध्ये पोलीस उपायुक्त व राजापेठ (अमरावती) पोलीस ठाण्याच्या नावाने लिहिलेली मृत्युपूर्व चिठ्ठी मिळाली. संबंधित मुलगी, साहिल राज ठाकरे हे मेसेज व कॉल करून दबाव टाकून सतत मानसिक छळ केल्याचे त्यात नमूद आहे. त्यांच्यासह जयंत कारमोरे यांनी संगनमत करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची लेखी तक्रार मृताचे वडील अनिल जगनाडे यांनी दिली. कारमोरे यांना शनिवारी दुपारी वर्धा येथून अटक करण्यात आली. ठाणेदार दीपक वानखडे, पीएसआय राहुल चौधरी, गणेश मुपडे, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाट, शेख गणी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू