शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तीन कोटी भगिनी बनतील ‘लखपतीदीदी’, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 05:51 IST

वर्धा आणि अमरावती मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वर्धा/ अमरावती : ‘चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि सभेला उपस्थित सर्व बंधू, भगिनींना माझा जय गुरुदेव’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीच्या महासंगमाची ही भूमी असून बलिदानाची गाथा सांगणाऱ्या आष्टी (शहीद) गावाची प्रेरणा आहे. गेल्या दहा वर्षांत आपण स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिलांसाठी एक चळवळ उभारली असून त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध क्षेत्रातील तीन कोटी भगिनींना लखपतीदीदी बनविणार ही मोदीची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

वर्धा आणि अमरावती मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे पार पडली. काँग्रेसने आजवर सामान्य माणसाची थट्टाच केली आहे. मात्र. गेल्या दहा वर्षांत चित्र बदलले आहे. देश आत्मनिर्भर होऊ लागला आहे.

गॅरंटी हा आपल्यासाठी तीन अक्षरांचा खेळ नसून देशाचा विकास करण्याचा संकल्प आहे. पुढील पाच वर्षांत गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार आहेत. प्रत्येक घरात पाण्याचा नळ पोहोचलेला असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या प्रत्येक वृद्धाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार दिला जाईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आता घरोघरी पाइपने पोहोचणार गॅसआधी प्रत्येकाला गॅस सिलिंडर देण्याचे काम एनडीए सरकारने केले आहे. भविष्यात प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. काँग्रेसने विदर्भाची नेहमी उपेक्षाच केली आहे. त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले. मात्र गेल्या दहा वर्षांत विदर्भाचाही झपाट्याने विकास होत असल्याचे आपण बघताहात. इंडी आघाडीच्या नेत्यांकडे विकासावर बोलण्यासाठी काही नाही.त्यामुळेच आता ते शिवराळ भाषेचा वापर करू लागले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

अमरावतीत टेक्सटाइल पार्क- देशात उभारल्या जाणाऱ्या टेक्सटाइल पार्कमध्ये अमरावतीचाही समावेश करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.- या पार्कमुळे लाखो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.- अमरावतीची संत्रा आणि वर्धा जिल्ह्याची हळदीमुळे सर्वदूर ओळख असल्याची बाबही त्यांनी भाषणात नमूद केली.

टॅग्स :Amravatiअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी