शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस विद्युत पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:58 AM

रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची दैना : कांदा, गहू, फळबागेच्या ओलितासाठी जिवाची जोखीम

अमोल धवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.सध्या कांदा लागवण सुरू आहे. गहू व फळबागेला ओलितासाठी दिवसा फक्त तीन दिवस कृषिपंपाला विद्युत पुरवठा होतो. आठवड्यातील हेच तीन दिवसांत शेतकऱ्यांना सुसह्य जातात. थंडीचे दिवस असल्याने रात्रीचे ओलीत करणे मात्र शेतकºयांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. रात्रीचे ओलीत करण्यासाठी एक तर मजूर मिळत नाही, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांची धास्ती राहते. विद्युत वाहिनीतील दोष दुरुस्त दिवसाच करावी लागते. त्यासाठी विद्युत पुरवठा बंद करावा लागतो.तालुक्यात १६६० हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. २१ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवण झाली आहे. ८१५ हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, लिंबू पिकाच्या फळबागा आहेत. त्याचे ओलीत बहुतेक शेतकरी दिवसाच करतात. त्यामुळे विद्युत पुरवठ्याचे दिवस वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.विहिरीला पाणी नाही. ती उपशावर आली आहे. रब्बी पिकांना पाण्याची गरज आहे. त्यासाठी महावितरणने दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी दिवस वाढवून द्यावेत.- देविदास सुने,शेतकरी, नांदगाव खंडेश्वरशेतात संत्राझाडे आहेत. त्यावर मृग बहर आहे. त्याला पाण्याची नितांत गरज आहे. दिवसा फक्त तीन दिवस विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील ओलीत होत नाही.- सुखदेवराव शिरभाते,शेतकरी, नांदगाव खंडेश्वर