शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

जिल्ह्यातील ६४५ गावांत महिलांच्या डोक्यावर हंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

पाणीटंचाईचा १५ कोटी २ लाखाचा आराखडा मंजूर अमरावती : दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. ...

पाणीटंचाईचा १५ कोटी २ लाखाचा आराखडा मंजूर

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. यावर्षीही उन्हाळ्याच्या झळा लागायला सुरुवात झाली असून जानेवारी ते मार्च मध्ये संभाव्य टंचाईच्या गावात टंचाई भासली नाही तर एप्रिल ते जून या कालावधीत ६४५ गाव वाड्या वस्त्या पाणीटंचाईची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या सुमारे १५ कोटी २ लाख ६८ हजार रुपये आराखड्यात मान्यता दिली आहे.

जिल्ह्यात अद्याप टंचाईची स्थिती निर्माण झाली नसल्याने उपाययोजना कराव्या लागल्या नसल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. झेडपी पाणीपुरवठा विभागाने जानेवरी ते जून २०२१ करिता पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्यातील १५८८ गावांपैकी ६४५ गावांत ९२२ योजनांच्या उपाययोजनांचा प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी नवाल यांनी या संभाव्य टंचाई आराखड्यास मंजुरी प्रदान केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता जितेंद्र गजबे यांनी दिली. मंजूर आराखड्यानुसार विंधन विहिरी घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, तात्पुरती पूरक नळयोजना कार्यान्वित करणे, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे, विहीर खोलीकरणास प्राधान्य देणे, तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात टंचाई जावण्यास प्रारंभ झाला आहे. सध्याच्या स्थितीत टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यकता भासली नसली तरी जिल्ह्यातील १४ ठिकाणी गावांना पाणी पुरवठयासाठी विहीरींचे अधिग्रहण करूण पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी उन्हाळयाचे दिवसात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ही मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील गावांना अधिक सहन करावी लागते. या गावांसह गैरआदिवासी भाग असलेल्या १२ तालुक्यातील काही गावांना पाणीपुरठ्यासाठी ३० ते ४० टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

बॉक्स

१४ विहिरींचे अधिग्रहण

उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता जिल्ह्यातील विविध गावांत मार्च महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. यंदाही काही गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाभरात १४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

बाॅक्स

पाणीटंचाईसाठी आराखडा तयार

जिल्ह्यात यावर्षी पाऊस समाधान कारक बरसला. त्यामुळे पाणी टंचाईचा आराखडा विविध कारणांमुळे विलंबाने तयार करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाने सन २०२१-२२ साठी सुमारे १५ कोटी २ लाख ६८ हजार रुपयांचा आराखडा तयार केला. सदर आराखडा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला असून यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत.

बॉक्स

तूर्तास टँकरने पाणी नाही

दरवरषी मेळघाटातील विशेषत: चिखलदरा तालुक्याती एकझिरा,सोनापूर,कोयलारी,पाचडोंगरी, सोमवारखेडा, मलकापूर, आकी ,तारूबांधा, बाहदरपूर, धरमडोह, मनभंग,मोथा,कोरडा आदी गावात दरवर्षी टॅकरने पाणी पुरवठा करावा लागतो.मात्र सध्या गावात पाणी पुरवठयासाठी टॅकर लावण्याची गरज पडली नाही.विशेष म्हणजे गत वर्षी मेळघाटातील २४ गावात २५ टॅकर सुरू करण्यात आले होते.

बॉक्स

२२१ योजनांची होणार दुरूस्ती

झेडपी पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडयात यावर्षी विविध ठिकाणच्या २२१ पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती केली जाणार आहे.याशिवाय ९४ नवीन कुपनलिका केल्या जाणारा आहेत.यामध्ये मोशी,वरूड आणि दर्यापूर ही तालुके वगळता अन्य १२ तालुक्यात या कुपनलिका प्रस्तावित केलेल्या आहेत.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण गावे-१५८८

बोरवेलची दुरूस्ती होणार-००

विहिरीतील गाव काढणे -००

पाणीटंचाईची संभाव्य गावे-६४५

जिल्ह्यात बोअरवेलचे खोदकाम होणार -९४

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती २२१