शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

कृषी स्वावलंबन योजनेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST

अमरावती : मागासवर्गीय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला राज्य शासनाने अंमलबजावणीसाठी ...

अमरावती : मागासवर्गीय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला राज्य शासनाने अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली. या आदेशामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. स्थगितीचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाले. कोरोना संकटामुळे या योजनेसाठी निधी नसल्याचा मुद्दा पत्रात स्पष्ट करण्यात आला आहे.

अनुसूचित जमातीतील पाच हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना विहिरीसाठी २.५० लाख रुपयांची मदत या योजनेद्वारे केली जाते. सोबतच कृषीपंपासाठी २५ हजार, वीज जोडणीसाठी १० हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. यासाठी उत्पन्नाची वार्षिक मर्यादा १.५० लाख रुपये इतकी आहे. या योजनेसाठी शंभर टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. जिल्ह्यात दरवर्षी २०० ते ३०० शेतकरी या योजनेसाठी अर्ज करतात. शासनाने उपलब्ध केलेल्या अनुदानाच्या तुलनेत लाभार्थी निवड करण्यात येते. साधारणत: १०० लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. मात्र, यंदा मे महिन्यात घेण्यात आलेल्या निर्णयात काही योजनांचे काम थांबविण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बराचसा निधी कोरोना संकटाच्या व्यवस्थापनासाठी वळता करण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या महसुलावर सुद्धा कोरोनाचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे सध्या काही योजनांच्या अनुदानात कपात करण्यात आली आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा समावेश आहे. त्यामुळे यंदा या योजनेच्या लाभार्थ्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सदर योजनेच्या स्थगितीबाबत पत्र जिल्हा परिषदेच्या कृषि विभागात धडकले आहे.

कोट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला शासनस्तरावरून स्थगिती देण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. पुढील आदेश आल्यानंतर सदर योजनेची नियमाप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.

- एल. जी. आडे,

कृषी विकास अधिकारी