शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

केंद्र सरकारचे धोरण देशाला अधोगतीकडे नेणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 8:33 PM

Amravati News केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात होत असलेला खासगी क्षेत्राचा शिरकाव ही बाब अत्यंत गंभीर आहे. ते धोरण देशाला अधोगतीकडे नेणार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला.

ठळक मुद्देशिक्षण, आरोग्य कृषी क्षेत्रातील खासगी क्षेत्राचा प्रभाव गंभीर

अमरावती : केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात होत असलेला खासगी क्षेत्राचा शिरकाव ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकारचे ते धोरण देशाला अधोगतीकडे नेणार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला. त्या बुधवारी अमरावती येथे ‘मीट द प्रेस’मध्ये बोलत होत्या. (Medha Patkar)

             शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर गत काही वर्षात खासगीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याबाबत सरकारने जी जबाबदारी घ्यायला हवी होती, ती घेतली जात नाही. कोरोना संकटकाळात केंद्र सरकारकडून ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता असताना राज्य सरकारला पाहिजे तशी मदत झाली नाही. सरकारने विमानतळ, बँकिंग या क्षेत्रात खासगीकरण केले आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत मोदी सरकारने तीन शेतकरी विरोधी कायदे पारित केलेत. शेती क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, यामुळे देशाची स्थिती दक्षिण आफ्रिकेसारखी होणार आहे. अन्न सुरक्षा योजनेचेही वाटोळे करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

२७ सप्टेंबरला बंदची हाक

केंद्रसरकारने उद्योगपतींचे हित जोपाण्यासाठीच तीन कृषी कायदे आणले आहेत. यामुळे शेती क्षेत्रात होणाऱ्या खासगीकरणामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे किसान समन्वय समितीने २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. यात जास्तीत शेतकरी, शेतमजूर, कामगार व अन्यही संघटनांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यमान राज्यपालांची भूमिका ही राजकीय असल्याची मेधा पाटकर म्हणाल्यात.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकर