शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

४५ चेकपोस्टवरील पोलीस झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:01 IST

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीत बाहेर पडू नका : दुपारी दोन वाजतानंतर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार २२ मार्च रोजी देशभर जनता कर्फ्यू यशस्वी झाला. त्यानंतर २३ मार्च रोजी संपूर्ण देशात संचारबंदीची घोषणा झाली. संपूर्ण देशच २४ मार्चपासून 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय शासनाने घेतला.जिल्ह्यात २३ व २४ मार्च या दोन दिवसांत तीव्र स्वरुपात संचारबंदीचा अनुभव नागरिकांना आला. पण नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद देऊ नये, असे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने संचारबंदीत शिथिलता आली. २९ मार्च रोजी दुपारी २ वाजतानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून आले. पूर्वीच्या तुलनेत शहर हद्दीतील ४५ ठिकाणी लावलेल्या नाकेबंदीतही शिथिलता आली असून या ठिकाणचे शेकडो पोलीस कमी केल्याची माहिती पुढे आली आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानावर रोज गर्दी वाढल्याचा अनुभव आला. मात्र, नागरिकांना त्रास देऊ नये, असे आदेश शासनच काढत असल्याने पोलीसही हतबल झाल्याची चित्र रविवारी दिसून आले. नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे २३ व २४ मार्च रोजी जसे ८०० पोलीस व १५० पेक्षा अधिक अधिकारी रस्त्यावर उतरले होते. त्या तुलनेत २९ मार्च रोजी रविवारी पोलीस रस्त्यावर दिसून आले नाही. रविवारी दुपारी २ वाजतानंतर शहरात फेरफटका मारला असता, राजकमल चौक, इतवारा, चित्रा चौक, इर्विन चौक व पंचवटी चौकासह इतर महत्त्वाच्या चौकात बोटावर मोजण्याइतकेच पोलीस रस्त्यावर होते. मात्र, आरोग्य सेवेकरिता रस्त्यावर फिरणारे आरोग्य सेवक, इतर कर्मचारी, आरोग्य सेवेकरिता बाहेर पडणारे नागरिक वगळता रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाला. त्यामुळे आता पोलिसांचा ताण काहिसा कमी झाला आहे.शहरातील पोलीस बंदोबस्त कमी केलेला नाही. परंतु ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. किंवा बाहेर जिल्ह्यातून दाखल होणाºया नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात नियोजन केले आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस