शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

४५ चेकपोस्टवरील पोलीस झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:01 IST

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीत बाहेर पडू नका : दुपारी दोन वाजतानंतर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार २२ मार्च रोजी देशभर जनता कर्फ्यू यशस्वी झाला. त्यानंतर २३ मार्च रोजी संपूर्ण देशात संचारबंदीची घोषणा झाली. संपूर्ण देशच २४ मार्चपासून 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय शासनाने घेतला.जिल्ह्यात २३ व २४ मार्च या दोन दिवसांत तीव्र स्वरुपात संचारबंदीचा अनुभव नागरिकांना आला. पण नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद देऊ नये, असे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने संचारबंदीत शिथिलता आली. २९ मार्च रोजी दुपारी २ वाजतानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून आले. पूर्वीच्या तुलनेत शहर हद्दीतील ४५ ठिकाणी लावलेल्या नाकेबंदीतही शिथिलता आली असून या ठिकाणचे शेकडो पोलीस कमी केल्याची माहिती पुढे आली आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानावर रोज गर्दी वाढल्याचा अनुभव आला. मात्र, नागरिकांना त्रास देऊ नये, असे आदेश शासनच काढत असल्याने पोलीसही हतबल झाल्याची चित्र रविवारी दिसून आले. नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे २३ व २४ मार्च रोजी जसे ८०० पोलीस व १५० पेक्षा अधिक अधिकारी रस्त्यावर उतरले होते. त्या तुलनेत २९ मार्च रोजी रविवारी पोलीस रस्त्यावर दिसून आले नाही. रविवारी दुपारी २ वाजतानंतर शहरात फेरफटका मारला असता, राजकमल चौक, इतवारा, चित्रा चौक, इर्विन चौक व पंचवटी चौकासह इतर महत्त्वाच्या चौकात बोटावर मोजण्याइतकेच पोलीस रस्त्यावर होते. मात्र, आरोग्य सेवेकरिता रस्त्यावर फिरणारे आरोग्य सेवक, इतर कर्मचारी, आरोग्य सेवेकरिता बाहेर पडणारे नागरिक वगळता रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाला. त्यामुळे आता पोलिसांचा ताण काहिसा कमी झाला आहे.शहरातील पोलीस बंदोबस्त कमी केलेला नाही. परंतु ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. किंवा बाहेर जिल्ह्यातून दाखल होणाºया नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात नियोजन केले आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस