शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

४५ चेकपोस्टवरील पोलीस झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:01 IST

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीत बाहेर पडू नका : दुपारी दोन वाजतानंतर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार २२ मार्च रोजी देशभर जनता कर्फ्यू यशस्वी झाला. त्यानंतर २३ मार्च रोजी संपूर्ण देशात संचारबंदीची घोषणा झाली. संपूर्ण देशच २४ मार्चपासून 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय शासनाने घेतला.जिल्ह्यात २३ व २४ मार्च या दोन दिवसांत तीव्र स्वरुपात संचारबंदीचा अनुभव नागरिकांना आला. पण नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद देऊ नये, असे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने संचारबंदीत शिथिलता आली. २९ मार्च रोजी दुपारी २ वाजतानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून आले. पूर्वीच्या तुलनेत शहर हद्दीतील ४५ ठिकाणी लावलेल्या नाकेबंदीतही शिथिलता आली असून या ठिकाणचे शेकडो पोलीस कमी केल्याची माहिती पुढे आली आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानावर रोज गर्दी वाढल्याचा अनुभव आला. मात्र, नागरिकांना त्रास देऊ नये, असे आदेश शासनच काढत असल्याने पोलीसही हतबल झाल्याची चित्र रविवारी दिसून आले. नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे २३ व २४ मार्च रोजी जसे ८०० पोलीस व १५० पेक्षा अधिक अधिकारी रस्त्यावर उतरले होते. त्या तुलनेत २९ मार्च रोजी रविवारी पोलीस रस्त्यावर दिसून आले नाही. रविवारी दुपारी २ वाजतानंतर शहरात फेरफटका मारला असता, राजकमल चौक, इतवारा, चित्रा चौक, इर्विन चौक व पंचवटी चौकासह इतर महत्त्वाच्या चौकात बोटावर मोजण्याइतकेच पोलीस रस्त्यावर होते. मात्र, आरोग्य सेवेकरिता रस्त्यावर फिरणारे आरोग्य सेवक, इतर कर्मचारी, आरोग्य सेवेकरिता बाहेर पडणारे नागरिक वगळता रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाला. त्यामुळे आता पोलिसांचा ताण काहिसा कमी झाला आहे.शहरातील पोलीस बंदोबस्त कमी केलेला नाही. परंतु ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. किंवा बाहेर जिल्ह्यातून दाखल होणाºया नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात नियोजन केले आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस