शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रेशन तांदळाची तस्करी; पोलिसांची प्रश्नपत्रिका ‘लय भारी’, तहसीलदारांना उत्तरेच येईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2022 14:11 IST

तीन आठवड्यांनंतरही भातकुली तहसीलकडून पोलिसांचे पत्र बेदखल

अमरावती : पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने ११ नोव्हेंबर रोजी भातकुली येथून एकूण ८५३ कट्टे तांदूळ व ट्रक जप्त केला होता. त्या प्रकरणाच्या वेगवान तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने एक प्रश्नावली पाठवून भातकुली तहसील प्रशासनाकडून अनुषंगिक माहिती मागितली. मात्र, तीन आठवडे होत असताना तहसीलदारांकडून त्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळाली नाहीत. पोलिसांची ती प्रश्नावली ‘लय भारी’ असेल, म्हणूनच की काय, एमपीएससीद्वारे पासआऊट झालेल्या तहसीलप्रमुखांना तिचे उत्तर देण्यास अधिक वेळ लागत असेल, अशी प्रतिक्रिया पोलिस वर्तुळात उमटली आहे. विशेष म्हणजे भातकुली तहसील प्रशासनाच्या लेटलतिफीवर न्यायालयानेदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भातकुली तहसील प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी तेथील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळील गजानन महाराज सभामंडपाच्या खुल्या जागेतून व एका ट्रकमधून तांदूळ जप्त केला. पोलिसांनी लागलीच त्याबाबत भातकुली तहसीलला माहिती दिली. त्यापूर्वी, ती तक्रार नोंदवायची की नाही, ती कुणी नोंदवायची, पोलिसांच्या कारवाईत अडकायचे का, यावर तहसील प्रशासन व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात मोठा संवाद झाला. आपण त्यात पडू नये, पोलिस चौकशीचा ससेमिरा नकोच, असा सूरही आवळला गेला. गुटखा कारवाईसाठी जसे अन्न सुरक्षा अधिकारी फिर्यादी होतात, तसे व्हावे की नाही, यावर बरेच चर्वितचर्वण झाले. अखेर दोन कार्यालयीन दिवस खल केल्यानंतर नायब तहसीलदार १३ ला सायंकाळनंतर एकदाचे फिर्यादी बनले.

दरम्यान, तो तपास भातकुली पोलिस ठाण्याकडून वर्ग झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने रेशन व्यवस्थेबाबत एक प्रश्नावली भातकुली तहसीलदारांना पाठविली. त्यात भातकुली तालुक्यात रेशनधारक किती, किती योजनांतर्गत एकूण मासिक नियतन किती, रेशनचा काळाबाजार होऊ नये यासाठी आपली भरारी पथके आहेत का, असेल तर असे प्रकार उघड झाले आहेत का किंवा त्यांच्या निदर्शनास आले काय, अशा मूलभूत प्रश्नांचा समावेश आहे. मात्र, त्या पत्राचे उत्तर तहसील प्रशासनाने अद्यापही दिले नाही. विशेष म्हणजे, त्या जप्त धान्याबाबत तहसीलचे मत काय, अशी विचारणा न्यायालयाने पोलिसांना केली. मात्र, तहसीलकडून अद्याप लेखी उत्तर अप्राप्त असल्याचे सांगताच न्यायालयानेदेखील आश्चर्य व्यक्त केले.

काय म्हणाले होते नायब तहसीलदार

याबाबत नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर यांनी तक्रार नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ट्रकचालकाने बालाजी ट्रेडर्सची सादर केलेली तांदळाची पावती ही बनावट असल्याचे निष्पन्न होत असून, अमोल महल्ले व जावेद खान हारून खान, नईम बेग ईस्माईल बेग यांनी अवैधरीत्या तांदळाची खरेदी करून तो बाहेर विक्रीला नेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ते धान्याची अफरातफरी व काळा बाजार करीत असल्याचे निष्पन्न होत असल्याचे निरीक्षण गाडेकर यांनी नोंदविले होते. त्यांचे ते कृत्य जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे उल्लघंन असल्याचे बनावट पावत्यावरून निष्पन्न होत असल्याची तक्रार गाडेकर यांनी नोंदविली होती.

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पत्र मिळाले. त्या पत्रातील प्रश्नावलीची उत्तरे देण्याची सूचना नायब तहसीलदारांना दिली आहे. ते उत्तर पाठवतील. पोलिसांनी जप्त केलेले ते तांदूळ प्रथमदर्शनी रेशनचे नाहीत.

- नीता लबडे, तहसीलदार

११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास भातकुली येथून तांदूळ जप्त केला होता. ते जप्त ८५३ कट्टे तांदूळ व ट्रक नेण्यासाठी भातकुली तहसील प्रशासनाने चार-पाच दिवस लावले. जप्त तांदळाबाबत एक प्रश्नावली पाठविली. त्याचे उत्तर बुधवारपर्यंत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे तपास रखडला आहे.

इम्रान नायकवडे, सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती