शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

मास्क लावून पोलीस कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM

गाडगेनगर, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली, राजापेठ तसेच इतर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या असता, शहर पोलीस एकदिलाने कार्य करताना दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता. एरवी राजकमल, जयस्तंभ इतर चौकांत गर्दी राहते. मात्र, रस्त्यावर क्वचित दुचाकीस्वार, वाहनचालक निदर्शनास आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाचा एकजुटीने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, जनता कर्फ्युला रविवारी पहाटेपासूनच अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये शहर पोलिसांनीही मुख्य भूमिका बजावली. कर्तव्यावरील पोलिसांनी दिवसभर मास्क लावून कामकाज केले.गाडगेनगर, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली, राजापेठ तसेच इतर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या असता, शहर पोलीस एकदिलाने कार्य करताना दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता. एरवी राजकमल, जयस्तंभ इतर चौकांत गर्दी राहते. मात्र, रस्त्यावर क्वचित दुचाकीस्वार, वाहनचालक निदर्शनास आले. मात्र, लाखो नागरिकांनी घरात राहणेस पसंद केले. रविवारी सकाळ ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्त होती. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत १८०० पोलीस कर्मचारी व २०० पोलीस अधिकारी कार्यरत होते. त्यापैकी ७५० पोलीस व १५० पोलीस अधिकारी शहरात रविवारी रस्त्यावर कार्यरत होते. ९ पोलीस ठाण्यांतर्गत २० फिक्स पॉर्इंट करण्यात आले होते. त्या प्रत्येक पॉर्इंटवर चार ते पाच पोलीस कार्यरत होते. रात्री ९ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने इतर पोलीस रात्री कर्तव्यावर हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यालयी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी चोख जबाबदारी पार पाडली. एका ठिकाणी पोलिसांचीही गर्दी होऊ नये, याची खबरदारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी घेतली. सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावून कामकाज करा, अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या होत्या. जनता कर्फ्युमुळे रविवारी कुठल्याही ठाण्यात एक दोन गुन्हे वगळता कुठल्याही तक्रारी दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनाही गेल्या अनेक वर्षांनंतर शांतता पहायला मिळाली, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्यात.रेल्वे, एसटी, ऑटोरिक्षांची चाके थांबलीअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमरावती जिल्हा ‘लॉकडाऊन’ होता. बहुतांश नागरिकांनी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घरीच राहणे पसंत केले. मात्र, बाहेरगावाहून रेल्वे, एसटी बसने अचानक आलेल्या प्रवाशांना घर गाठताना पायी जावे लागले. एसटी, ऑटोरिक्षा, शहर बस बंदचा फटका बाहेरगावाहून आलेल्यांना बसला, हे विशेष. ‘जनता कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, मोजक्याच लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू होत्या. या रेल्वे गाड्यांद्वारे काही प्रवासी रविवारी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर आले होते. मात्र, घर गाठताना कसे जावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. रविवारी सकाळपासून ऑटोरिक्षा, शहर बस, खासगी वाहने बंद करण्यात आली होती. त्यामुळे अमरावतीसह ग्रामीण भागात घर गाठण्यासाठी प्रवाशांची मोठी दमछाक झाली. काही प्रवासी बडनेरा येथून अमरावतीत पायी जाताना दिसून आले. रेल्वे स्थानकावर येताच प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान क्षणभर थांबू देत नव्हते. त्यामुळे सोबत बॅग, साहित्य पायी घेऊन जाण्याचा प्रसंग अनेकांवर ओढवला. अमरावती ते बडनेरा मार्ग दिवसभर निर्मनुष्य होता. एरव्ही गर्दीने गजबजून राहणाºया बडनेरा रेल्वे स्थानकावरील स्टॉल, कॅन्टीन, उपहारगृह, बूक डेपो बंद करण्यात आले होते. सर्वत्र सन्नाटा अनुभवता आला. काही प्रवाशांना एसटी बस स्थानकावरूनसुद्धा घरी पायी जावे लागले.इतवारा बाजार बंदकरून दाखवलाचकोणत्याची राजकीय पक्षाचे बंद, आंदोलन असले तरी कधीही येथील इतवारा बाजार बंद झाला नाही, असे जुन्या जाणत्या लोकांचे म्हणने आहे. मात्र, रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये इतवारा बाजारात निरव शांतता दिसून आली. दुकाने, प्रतिष्ठानांना कुलूप होते. किराणा, फळे, भाजीपाला, हातगाड्यांसह मुस्लिमबहुल भागही बंद होता. त्यामुळे अखेर हातघाईस आणलेल्या कोरोना विषाणूने इतवाराबाजार परिसर बंद करून दाखवल्याचे चित्र अनुभवता आले.