शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
5
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
6
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
7
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
8
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
9
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
10
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
12
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
13
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
14
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
15
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
16
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
17
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
18
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
19
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
20
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

मास्क लावून पोलीस कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

गाडगेनगर, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली, राजापेठ तसेच इतर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या असता, शहर पोलीस एकदिलाने कार्य करताना दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता. एरवी राजकमल, जयस्तंभ इतर चौकांत गर्दी राहते. मात्र, रस्त्यावर क्वचित दुचाकीस्वार, वाहनचालक निदर्शनास आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्गाचा एकजुटीने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, जनता कर्फ्युला रविवारी पहाटेपासूनच अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये शहर पोलिसांनीही मुख्य भूमिका बजावली. कर्तव्यावरील पोलिसांनी दिवसभर मास्क लावून कामकाज केले.गाडगेनगर, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली, राजापेठ तसेच इतर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या असता, शहर पोलीस एकदिलाने कार्य करताना दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र रस्त्यांवर शुकशुकाट होता. एरवी राजकमल, जयस्तंभ इतर चौकांत गर्दी राहते. मात्र, रस्त्यावर क्वचित दुचाकीस्वार, वाहनचालक निदर्शनास आले. मात्र, लाखो नागरिकांनी घरात राहणेस पसंद केले. रविवारी सकाळ ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्त होती. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत १८०० पोलीस कर्मचारी व २०० पोलीस अधिकारी कार्यरत होते. त्यापैकी ७५० पोलीस व १५० पोलीस अधिकारी शहरात रविवारी रस्त्यावर कार्यरत होते. ९ पोलीस ठाण्यांतर्गत २० फिक्स पॉर्इंट करण्यात आले होते. त्या प्रत्येक पॉर्इंटवर चार ते पाच पोलीस कार्यरत होते. रात्री ९ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने इतर पोलीस रात्री कर्तव्यावर हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यालयी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी चोख जबाबदारी पार पाडली. एका ठिकाणी पोलिसांचीही गर्दी होऊ नये, याची खबरदारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी घेतली. सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावून कामकाज करा, अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या होत्या. जनता कर्फ्युमुळे रविवारी कुठल्याही ठाण्यात एक दोन गुन्हे वगळता कुठल्याही तक्रारी दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनाही गेल्या अनेक वर्षांनंतर शांतता पहायला मिळाली, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्यात.रेल्वे, एसटी, ऑटोरिक्षांची चाके थांबलीअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमरावती जिल्हा ‘लॉकडाऊन’ होता. बहुतांश नागरिकांनी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घरीच राहणे पसंत केले. मात्र, बाहेरगावाहून रेल्वे, एसटी बसने अचानक आलेल्या प्रवाशांना घर गाठताना पायी जावे लागले. एसटी, ऑटोरिक्षा, शहर बस बंदचा फटका बाहेरगावाहून आलेल्यांना बसला, हे विशेष. ‘जनता कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, मोजक्याच लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू होत्या. या रेल्वे गाड्यांद्वारे काही प्रवासी रविवारी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर आले होते. मात्र, घर गाठताना कसे जावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. रविवारी सकाळपासून ऑटोरिक्षा, शहर बस, खासगी वाहने बंद करण्यात आली होती. त्यामुळे अमरावतीसह ग्रामीण भागात घर गाठण्यासाठी प्रवाशांची मोठी दमछाक झाली. काही प्रवासी बडनेरा येथून अमरावतीत पायी जाताना दिसून आले. रेल्वे स्थानकावर येताच प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान क्षणभर थांबू देत नव्हते. त्यामुळे सोबत बॅग, साहित्य पायी घेऊन जाण्याचा प्रसंग अनेकांवर ओढवला. अमरावती ते बडनेरा मार्ग दिवसभर निर्मनुष्य होता. एरव्ही गर्दीने गजबजून राहणाºया बडनेरा रेल्वे स्थानकावरील स्टॉल, कॅन्टीन, उपहारगृह, बूक डेपो बंद करण्यात आले होते. सर्वत्र सन्नाटा अनुभवता आला. काही प्रवाशांना एसटी बस स्थानकावरूनसुद्धा घरी पायी जावे लागले.इतवारा बाजार बंदकरून दाखवलाचकोणत्याची राजकीय पक्षाचे बंद, आंदोलन असले तरी कधीही येथील इतवारा बाजार बंद झाला नाही, असे जुन्या जाणत्या लोकांचे म्हणने आहे. मात्र, रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये इतवारा बाजारात निरव शांतता दिसून आली. दुकाने, प्रतिष्ठानांना कुलूप होते. किराणा, फळे, भाजीपाला, हातगाड्यांसह मुस्लिमबहुल भागही बंद होता. त्यामुळे अखेर हातघाईस आणलेल्या कोरोना विषाणूने इतवाराबाजार परिसर बंद करून दाखवल्याचे चित्र अनुभवता आले.